शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दोन अपयशांनंतर यूपीत तिसऱ्यांदा प्लॅस्टिकबंदी! १५ जुलैपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 1:48 AM

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

लखनौ : महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.या घोषणेमुळे १५ जुलैनंतर उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकच्या पिशव्या, कप व ग्लास यावर बंदी येणार आहे. त्यांचा वापर आतापासूनच थांबवावा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी येथील वन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.स्वत:च्या शरीराचे स्वास्थ्य टिकविण्याबरोबरच पृथ्वीचे आरोग्य टिकविण्याची जबाबदारीही आपली आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिकवर बंदी घालणे गरजेचे आहे, असे सांगतानाच उत्तर प्रदेशातील जवळपास सर्व नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा साचला आहे. तो काढण्यात अडचणी येत आहेत आणि तो अडकून राहिल्यामुळे नद्यांना पूर येत आहेत, नद्यांचे पाणी गावांमध्ये व शेतात शिरून आपले नुकसान होत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.योगी आदित्यनाथ यांनी १५ जुलैपासून प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली होती. तिची नीट अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्वात आधी २0१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही बंदी घातली होती.त्यानंतरही राज्यात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, २0१६ साली त्यांनी पुन्हा प्लॅस्टिकबंदी जाहीर करताना, त्यासाठी कडक नियम ठरवून दिले, परंतु त्याचा परिणाम अद्यापझाला नसल्याने योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा बंदी घातलीआहे. (वृत्तसंस्था)२५ राज्यांत बंदीदेशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. सर्वात आधी सिक्किम राज्यात त्यावर बंदी घालण्यात आली आणि तिथे ती यशस्वी झाली आहे. काही राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घातली असली, तरी त्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली नाही, तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घातलेली बंदी अंशत: आहे. म्हणजेच काही प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास राज्यात संमती आहे. केरळने समुद्रातील प्लॅस्टिकचा वापर रस्तेबांधणीसाठी सुरू केला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी