शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तीन वर्षांनी मीच उद्घाटनाला येईन; मोदी यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 14:13 IST

या भाषणात मोदी यांनी काँग्रेसवर खूपच कमी आरोप केले. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख पटनायकच होते.

तालचर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये आज विमानतळ, खत निर्मितीच्या कारखान्याच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ओडिशातील बिजू जनता दलावर आरोप करत मुख्यमंत्री नविन पटनायक यांच्यावर टीका केली. तसेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा दावाही केला. मोदी म्हणाले की, खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील 36 महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि मीच उद्घाटनाला येईन, असे त्यांनी सूचित केले.

महत्वाचे म्हणजे या भाषणात मोदी यांनी काँग्रेसवर खूपच कमी आरोप केले. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख पटनायकच होते. यामुळे पंतप्रधानांनी जाहीरपणे पुढील काळात ओडिशामध्ये भाजप विरोधात बीजेडी असणार असल्याचे संकेत दिले. 

मोदी म्हणाले की, खत निर्मितीच्या कारखान्यावर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2000 मध्ये तालचर खत निर्मितीच्या कारखान्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा कारखाना धूळ खात पडून होता. अधिकाऱ्यांनी 36 महिन्यात या कारखान्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 36 महिन्यांनी मी या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. गोरखपूर, झारखंड, तेलंगानामधील खत निर्मितीच्या कारखान्यांची उदाहरणे देताना मोदी म्हणाले, तेथील सरकारे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत. राजीव गांधी म्हणाले होते, एक रुपयापैकी 15 पैसेच लोकांपर्यंत पोहोचत होते. आज बँकिंग प्रणालीमुळे अख्खा रुपया जनतेपर्यंत जात असल्याचे मोदी म्हणाले.

स्वच्छता मोहिमेवरून पटनायक यांच्यावर आरोप करताना मोदी म्हणाले  की, 2014 मध्ये गावांतील स्वच्छता केवळ 10 टक्के होती. आमच्या सरकारने त्यामध्ये वेग आणून 55 टक्के केली आहे. पटनायकना तेव्हा सांगितले होते, की देश पुढे जातोय ओडिशा मागे राहील. स्वच्छतागृह बनली नाहीत. ओडिशाच्या जनतेला चांगले आरोग्य लाभण्याची प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात झारसुगुडा येथील विमानतळाचेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री नविन पटनायक उपस्थित होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOdishaओदिशाBiju Janata Dalबिजू जनता दलBJPभाजपा