शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:05 IST

म्हणाले, जुन्या दोस्तांशी आघाडीस तयार : वाजपेयींच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्याची दिली ग्वाही

चेन्नई : तीन राज्यांमध्ये झालेला पराभव आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणाऱ्या पक्षांची वाढत चाललेली संख्यायाचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मित्रपक्षांना सोबत घेण्याची भाषा सुरू केली आहे. मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यास भाजपा तयार आहे. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही वाटचाल करू. जुन्या मित्रांचाही सन्मानच करतो, असे मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आसाम गण परिषद रालोआतून बाहेर पडता. त्याआधी उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, तेलगू देसमही बाहेर पडले, तर शिवसेना सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर टीका करीत असून, युती गेली खड्यात अशी उद्धव ठाकरे यांची भाषा आहे. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, पीएमके, एमडीएमकेसह सहा पक्षांच्या आघाडीने तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा लढविल्या. त्यापैकी भाजप व पीएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र त्यानंतर हे पाचही पक्ष आघाडीतून बाहेर पडले.तामिळनाडूत बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधनाता मोदी म्हणाले की, १९९०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी

आघाडी सरकार उत्तमरित्या चालवून दाखविले. त्यांनी प्रादेशिक पक्षांना नेहमीच महत्त्व दिले. या मार्गावरच भाजपाने पुढे वाटचाल केली आहे. आघाडीसाठी भाजपाचे दरवाजे सदैव खुले आहेत.अद्रमुक, द्रमुक किंवा अभिनेते रजनीकांत यांच्याशी युती करणार का या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना नेहमीच वाईट वागणूक दिली. त्या-त्या राज्यांतील लोकांची मते, अस्मिता यांना कायम दुय्यम लेखले. राज्य करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा भ्रमात काँग्रेस पक्ष होता. एनडीए ही मजबूत आघाडीमोदी म्हणाले की, रालोआ मजबूत आहे. त्यातील मित्रपक्षांचा परस्परांवर गाढ विश्वास आहे. भाजपाला स्वबळावर जरी बहुमत मिळाले तरी मित्रपक्षांनाही सरकारमध्ये घेऊ. जास्तीत जास्त लोक जोडणे हे राजकीय आघाडीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक