शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:05 IST

म्हणाले, जुन्या दोस्तांशी आघाडीस तयार : वाजपेयींच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्याची दिली ग्वाही

चेन्नई : तीन राज्यांमध्ये झालेला पराभव आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणाऱ्या पक्षांची वाढत चाललेली संख्यायाचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मित्रपक्षांना सोबत घेण्याची भाषा सुरू केली आहे. मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यास भाजपा तयार आहे. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही वाटचाल करू. जुन्या मित्रांचाही सन्मानच करतो, असे मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आसाम गण परिषद रालोआतून बाहेर पडता. त्याआधी उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, तेलगू देसमही बाहेर पडले, तर शिवसेना सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर टीका करीत असून, युती गेली खड्यात अशी उद्धव ठाकरे यांची भाषा आहे. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, पीएमके, एमडीएमकेसह सहा पक्षांच्या आघाडीने तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा लढविल्या. त्यापैकी भाजप व पीएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र त्यानंतर हे पाचही पक्ष आघाडीतून बाहेर पडले.तामिळनाडूत बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधनाता मोदी म्हणाले की, १९९०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी

आघाडी सरकार उत्तमरित्या चालवून दाखविले. त्यांनी प्रादेशिक पक्षांना नेहमीच महत्त्व दिले. या मार्गावरच भाजपाने पुढे वाटचाल केली आहे. आघाडीसाठी भाजपाचे दरवाजे सदैव खुले आहेत.अद्रमुक, द्रमुक किंवा अभिनेते रजनीकांत यांच्याशी युती करणार का या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना नेहमीच वाईट वागणूक दिली. त्या-त्या राज्यांतील लोकांची मते, अस्मिता यांना कायम दुय्यम लेखले. राज्य करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा भ्रमात काँग्रेस पक्ष होता. एनडीए ही मजबूत आघाडीमोदी म्हणाले की, रालोआ मजबूत आहे. त्यातील मित्रपक्षांचा परस्परांवर गाढ विश्वास आहे. भाजपाला स्वबळावर जरी बहुमत मिळाले तरी मित्रपक्षांनाही सरकारमध्ये घेऊ. जास्तीत जास्त लोक जोडणे हे राजकीय आघाडीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक