शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्येही घटलं भाजपाचं बळ, विधेयकं पारित करताना अडचणी येणार? असा आहे नंबर गेम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:19 IST

BJP News: यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं. मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्याबळ घटलं आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं. मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्याबळ घटलं आहे. राज्यसभेमधील भाजपाचे चार नामनिर्देशित खासदार शनिवारी निवृत्त झाले. त्याबरोबरच वरिष्ठ सभागृहात भाजपाचं संख्याबळ घटून ८६ वर तर एनडीएचं संख्याबळ १०१ पर्यंत खाली आलं. दरम्यान, १९ जागा रिक्त झाल्याने सद्यस्थितीत राज्यसभेतील खासदारांची संख्या २२६ एवढी झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेमध्ये कामकाज चालवताना सत्ताधारी भाजपासमोरील अडचणी वाढणार का? संख्याबळ कमी झाल्याने एनडीएचं नुकसान होणार का? प्रमुख कायदे पारित करण्यासाठी एनडीएकडे पुरेसं संख्याबळ आहे की नाही, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

मात्र संख्याबळ घटलं असलं तरी राज्यसभेमध्ये भाजपा अजूनही भक्कम स्थितीत आहे. तसेच सभागृहातील नंबर गेममध्येही अजूनही भाजपा पुढे आहे. एनडीएकडे अजूनही सात बिगरराजकीय नियुक्त सदस्य, २ अपक्ष आणि एआएडीएमके आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महत्त्वाची विधेयके आणि कायदे मंजूर करून घेण्याइतपत संख्याबळ एनडीएकडे आहे. मात्र इतर पक्षांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भाजपाला नियुक्त सदस्यांची पदं लवकरात लवकर भरावी लागतील.  

सध्या राज्यसभेमधील राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी हे चार नियुक्त सदस्य निवृत्त झाले आहेत. राज्यसभेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर या चारही सदस्यांनी भाजपाचं सदस्यत्व घेतलं होतं. नियुक्त खासदारांमधील आणखी एक सदस्य गुलाम अली हे आहेत. ते २०२८ मध्ये निवृत्त  होतील. सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्यांची नियुक्ती करतात. सध्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी ७ सदस्यांनी स्वत:ला पक्षीय राजकारणापासून दूर ठेवलं आहे. मात्र सभागृहात कायदे पारित करताना ते सरकारला साथ देतात. 

सध्याच्या काळात राज्यसभेमध्ये १९ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जम्मू-काश्मीर आणि राष्ट्रपतींकडून नियुक्त होणाऱ्या प्रत्येकी ४ आणि आठ वेगवेगळ्या राज्यांमधील ११ जागा रिक्त झालेल्या आहेत. या ११ जागांपैकी १० जागा ह्या लोकसभा निवडणुकीमुळे रिक्त झाल्या आहेत. तर बीआरएसचे खासदार केशव राव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. आता येणाऱ्या काळात ११ जागांवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएला ८ जागा तर इंडिया आघाडीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला तेलंगाणामध्ये १ जागा मिळेल. त्यामुळे त्यांची सदस्यसंख्या २७ पर्यंत पोहोचेल. मात्र भाजपाला राज्यसभेमध्ये महत्त्वाची विधेयकं पारित करण्यासाठी भाजपाला अडचणी येण्याची शक्यता फार कमी आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी