शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Rahul Gandhi: मी अध्यक्षांकडे गेलो, ते फक्त हसले...; खासदारकी गेली तरी घाबरणार नाही, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 14:19 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेतल्यानंतर आज पहिल्यांदा गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेतल्यानंतर आज पहिल्यांदा गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. अदानी-मोदी संबंधांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला घेरले. तसेच 'पंतप्रधान माझ्या भाषणाला घाबरतात म्हणून मला अपात्र ठरवण्यात आले. ते माझ्या पुढच्या भाषणाला घाबरत होते, ते भाषण अदानी यांच्यावर होते, असा आरोपही राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केला.

'मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, माझ्या पुढच्या भाषणाबद्दल ते घाबरले होते. संसदेतील माझे पुढचे भाषण त्यांना नको होते. भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी अनेकदा सांगितले आहे. याबाबत रोज नवनवीन उदाहरणे मिळतात. मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता. 'अदानीजींच्या शेज कंपन्या आहेत, त्यात कोणीतरी २०,००० कोटी रुपये गुंतवले आहेत. यात अदानींचा पैसा नाही. हा त्यांचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे, पैसा दुसऱ्याचा आहे. हे  २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? प्रश्न असा आहे. यात एक चिनी सामील आहे, कोणी प्रश्न का विचारत नाही? मी संसदेत पुरावे देऊन अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांबद्दल बोललो, जे मी मीडिया रिपोर्ट्समधून काढले होते. यानंतर राहुल गांधी यांनी लंडनमधील वक्तव्यावरून झालेल्या वादावर भाजपवर जोरदार प्रहार केले. 

Maharashtra Politics: “कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन् पाकिस्तानात पाठवून द्या”

राहुल गांधी म्हणाले की, मी परकीय सैन्याची मदत घेतली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. हे संपूर्ण नाटक पीएम मोदींना वाचवण्यासाठी रचण्यात आले आहे. या लोकांना अजून समजले नाही, मी तुरुंगात जाण्यास घाबरणार नाही, असंही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, मोदी आणि अदानी यांचे नाते नवीन नाही, जुने आहे. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे नाते आहे. मी विमानाचा फोटो दाखवला. नरेंद्र मोदीजी त्यांच्या मित्रासोबत अगदी आरामात बसले होते. मी संसदेत फोटो दाखवला. त्यानंतर माझे भाषण काढले, असंही राहुल गांधी म्हणाले. मी अध्यक्षांना तपशीलवार पत्र लिहिले. मी म्हणालो की नियम बदलले आणि विमानतळ अदानीजींना देण्यात आले पण काही फरक पडला नाही. माझ्याबद्दल मंत्र्यांनी संसदेत खोटे बोलले. मी परकीय सैन्याची मदत मागितली होती, असा मंत्र्यांनी आरोप केला. मी असं काहीही केलेले नाही, असंही गांधी म्हणाले.

मी सभापतींना सांगितले की, साहेब, संसदेचा नियम आहे की कोणत्याही सदस्यावर आरोप झाले तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आहे. मी एक पत्र लिहिले पण उत्तर मिळाले नाही, दुसरे पत्र लिहिले आणि उत्तर मिळाले नाही. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जाऊन म्हणालो की, साहेब कायदा आहे, तुम्ही मला बोलू का देत नाही. सभापती महोदय हसले आणि म्हणाले की, मी काही करू शकत नाही. त्यानंतर काय झाले, ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे, मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही,  असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस