शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Rahul Gandhi: मी अध्यक्षांकडे गेलो, ते फक्त हसले...; खासदारकी गेली तरी घाबरणार नाही, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 14:19 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेतल्यानंतर आज पहिल्यांदा गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेतल्यानंतर आज पहिल्यांदा गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. अदानी-मोदी संबंधांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला घेरले. तसेच 'पंतप्रधान माझ्या भाषणाला घाबरतात म्हणून मला अपात्र ठरवण्यात आले. ते माझ्या पुढच्या भाषणाला घाबरत होते, ते भाषण अदानी यांच्यावर होते, असा आरोपही राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केला.

'मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, माझ्या पुढच्या भाषणाबद्दल ते घाबरले होते. संसदेतील माझे पुढचे भाषण त्यांना नको होते. भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी अनेकदा सांगितले आहे. याबाबत रोज नवनवीन उदाहरणे मिळतात. मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता. 'अदानीजींच्या शेज कंपन्या आहेत, त्यात कोणीतरी २०,००० कोटी रुपये गुंतवले आहेत. यात अदानींचा पैसा नाही. हा त्यांचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे, पैसा दुसऱ्याचा आहे. हे  २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? प्रश्न असा आहे. यात एक चिनी सामील आहे, कोणी प्रश्न का विचारत नाही? मी संसदेत पुरावे देऊन अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांबद्दल बोललो, जे मी मीडिया रिपोर्ट्समधून काढले होते. यानंतर राहुल गांधी यांनी लंडनमधील वक्तव्यावरून झालेल्या वादावर भाजपवर जोरदार प्रहार केले. 

Maharashtra Politics: “कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन् पाकिस्तानात पाठवून द्या”

राहुल गांधी म्हणाले की, मी परकीय सैन्याची मदत घेतली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. हे संपूर्ण नाटक पीएम मोदींना वाचवण्यासाठी रचण्यात आले आहे. या लोकांना अजून समजले नाही, मी तुरुंगात जाण्यास घाबरणार नाही, असंही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, मोदी आणि अदानी यांचे नाते नवीन नाही, जुने आहे. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे नाते आहे. मी विमानाचा फोटो दाखवला. नरेंद्र मोदीजी त्यांच्या मित्रासोबत अगदी आरामात बसले होते. मी संसदेत फोटो दाखवला. त्यानंतर माझे भाषण काढले, असंही राहुल गांधी म्हणाले. मी अध्यक्षांना तपशीलवार पत्र लिहिले. मी म्हणालो की नियम बदलले आणि विमानतळ अदानीजींना देण्यात आले पण काही फरक पडला नाही. माझ्याबद्दल मंत्र्यांनी संसदेत खोटे बोलले. मी परकीय सैन्याची मदत मागितली होती, असा मंत्र्यांनी आरोप केला. मी असं काहीही केलेले नाही, असंही गांधी म्हणाले.

मी सभापतींना सांगितले की, साहेब, संसदेचा नियम आहे की कोणत्याही सदस्यावर आरोप झाले तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आहे. मी एक पत्र लिहिले पण उत्तर मिळाले नाही, दुसरे पत्र लिहिले आणि उत्तर मिळाले नाही. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जाऊन म्हणालो की, साहेब कायदा आहे, तुम्ही मला बोलू का देत नाही. सभापती महोदय हसले आणि म्हणाले की, मी काही करू शकत नाही. त्यानंतर काय झाले, ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे, मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही,  असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस