शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 08:00 IST

सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

ठळक मुद्देसन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशाचे नवनिर्वाचित केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्विकारताच माहिती तंत्रज्ञान खात्याकडून कंपन्यांना इशारा दिला आहे. मावळते मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या भूमिकेला पुढे नेत ट्विटरला कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कंपन्यांना इथले नियम पाळावेच लागतील असा स्पष्ट संदेश अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला दिला आहे. तर, रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार घेताच, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश जारी केला आहे.  

सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्विकारताच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. पहिल्याचदिवशी मंत्रालयीन कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचा आदेशा जारी केला आहे. त्यानुसार, येथील कर्मचाऱ्यांना आता दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. सकाळची शिफ्ट 7 वाजता सुरू होणार असून 4 वाजेपर्यंत काम राहिल. तर, दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजता सुरू होवून रात्री 12 वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे. 

रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डीजे नारायण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, हा आदेश केवळ (एमआर सेल) मंत्रालयीन कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागू राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अश्विन वैष्णव हे ओडिशातून राज्यसभा खासदार असून प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळेच, त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली आहे. 

ट्विटरने मागितली 8 आठवड्यांची मुदत

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नव्या आयटी कायद्यांवरुन घमासान सुरू आहे. नव्या कायद्यामुळे सोशल मीडिया वेबसाइट्स देखील आता अनुचित प्रकार आणि घटनांसाठी जबाबदार ठरणार आहेत. याशिवाय ट्विटरनं कंपनीचा तक्रार अधिकारी नेमण्यासाठी दिल्ली हायकोर्टाकडे आठ आठवड्यांची मुदत मागितली आहे. नव्या नियमांनुसार तक्रार आणि अनुपालन अधिकाऱ्याची नेमणूक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेministerमंत्रीdelhiदिल्लीEmployeeकर्मचारीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव