शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 08:00 IST

सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

ठळक मुद्देसन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशाचे नवनिर्वाचित केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्विकारताच माहिती तंत्रज्ञान खात्याकडून कंपन्यांना इशारा दिला आहे. मावळते मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या भूमिकेला पुढे नेत ट्विटरला कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कंपन्यांना इथले नियम पाळावेच लागतील असा स्पष्ट संदेश अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला दिला आहे. तर, रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार घेताच, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश जारी केला आहे.  

सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्विकारताच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. पहिल्याचदिवशी मंत्रालयीन कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचा आदेशा जारी केला आहे. त्यानुसार, येथील कर्मचाऱ्यांना आता दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. सकाळची शिफ्ट 7 वाजता सुरू होणार असून 4 वाजेपर्यंत काम राहिल. तर, दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजता सुरू होवून रात्री 12 वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे. 

रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डीजे नारायण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, हा आदेश केवळ (एमआर सेल) मंत्रालयीन कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागू राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अश्विन वैष्णव हे ओडिशातून राज्यसभा खासदार असून प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळेच, त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली आहे. 

ट्विटरने मागितली 8 आठवड्यांची मुदत

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नव्या आयटी कायद्यांवरुन घमासान सुरू आहे. नव्या कायद्यामुळे सोशल मीडिया वेबसाइट्स देखील आता अनुचित प्रकार आणि घटनांसाठी जबाबदार ठरणार आहेत. याशिवाय ट्विटरनं कंपनीचा तक्रार अधिकारी नेमण्यासाठी दिल्ली हायकोर्टाकडे आठ आठवड्यांची मुदत मागितली आहे. नव्या नियमांनुसार तक्रार आणि अनुपालन अधिकाऱ्याची नेमणूक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेministerमंत्रीdelhiदिल्लीEmployeeकर्मचारीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव