शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीला धक्का; माढ्याचे आमदार भाजपात जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:20 IST

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्याचं धोरण आखलं आहे.

नवी दिल्ली - राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीची सूत्रे दिल्लीहून फिरवली जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत. या दिल्ली दौऱ्यावेळी शिंदे-फडणवीसांनी शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहचले आहेत.  दिल्लीत या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

बबन शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आता शिंदे फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं ते भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. झी २४ तासनं याबाबत वृत्त दिले आहे. मतदारसंघात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या दिशेने जाण्याचे संकेत दिले जात होते. जय श्री राम असा संदेश कार्यकर्ते एकमेकांना देत होते. परंतु बबन शिंदे यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार बबन शिंदे यांनी रविवारी रात्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु या भेटीत काही सकारात्मक न घडल्याची माहिती आहे. बबन शिंदे हे आमदार आहेत त्यामुळे जर अशाप्रकारे त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश घेतला तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. 

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेला धक्का दिला आहे. जालना मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच शिवसंवाद यात्रेनिमित्त युवा नेते आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी खोतकर आदित्य यांच्यासोबत रॅलीत सहभागी झाले होते. आता शिवसंवाद यात्रा संपल्यानंतर खोतकरांनी उचललेलं हे पाऊल शिवसेनेसाठी धक्का देणारं ठरलं आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्याचं धोरण आखलं आहे. त्यात शिवसेनेला फटका बसला. पण आता काँग्रेस-राष्ट्रवादीलाही याची झळ सोसावी लागत आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, माजी आमदार यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय मेगाभरती पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात काही नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत व्हेट अँन्ड वॉचची भूमिका स्वीकारली आहे.  

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा