शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:50 IST

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून भाजपाने ३ राज्यांचे मुख्यमंत्री बदलले त्यानंतर आता काँग्रेसदेखील हीच रणनीती वापरताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री बदलून नवं धक्कातंत्र वापरलं आता राजस्थान काँग्रेसमध्येही हेच घडणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या २ दिवसांपासून राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट दिल्ली दरबारी आहेत. याठिकाणी पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली. पायलट आणि राहुल गांधी यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे कारण राजस्थानात बंडखोरी केल्यानंतर मागील १ वर्षात पहिल्यांदाच सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. या भेटीत ३ मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यात राजस्थानमध्ये संघटनेत बदल करावा ही प्रमुख मागणी होती. तसेच मंत्रिमंडळ बदल आणि पक्षात पायलट यांची भूमिका यावर चर्चा झाली.

सचिन पायलट समर्थकांचा दावा आहे की, राजस्थानात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पायलट यांना संधी द्यावी. त्यानंतर अशोक गहलोत मंत्रिमंडळात फेरबदल करून संघटनेच्या काही महिन्यात बदल करण्यात यावेत. पार्टी हायकमांडही गहलोत मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची सुट्टी करून नवी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या बदलासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि पुन्हा कार्यालयीन कामकाजाच्या सुरु होण्याची पक्ष वाट पाहतोय.

प्रमोद कृष्णन यांच्या ट्विटनं वाढवली उत्सुकता

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी स्पष्ट केलंय की, अशोक गहलोत बरे झाल्यानंतर राजस्थानात बदल करणार आहोत. काय करायचं हे सगळं तयार आहे. प्रियंका गांधी यांच्या जवळचे सहकारी आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एका ट्विटमधून संकेत दिलेत की, पंजाबमधील वारं राजस्थान आणि छत्तीसगडमधील वातावरण बिघडवू शकतात. परंतु AICC मधल्या सूत्रांचा दावा आहे की, पंजाबप्रमाणे राजस्थानात कुठलेही मोठे बदल पुढील वर्ष मार्चपर्यंत केले जाणार नाहीत. परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाईल. मात्र संघटनेत आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येतील असं त्यांनी दावा केला.  

टॅग्स :PunjabपंजाबSachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान