शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:50 IST

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून भाजपाने ३ राज्यांचे मुख्यमंत्री बदलले त्यानंतर आता काँग्रेसदेखील हीच रणनीती वापरताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री बदलून नवं धक्कातंत्र वापरलं आता राजस्थान काँग्रेसमध्येही हेच घडणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या २ दिवसांपासून राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट दिल्ली दरबारी आहेत. याठिकाणी पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली. पायलट आणि राहुल गांधी यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे कारण राजस्थानात बंडखोरी केल्यानंतर मागील १ वर्षात पहिल्यांदाच सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. या भेटीत ३ मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यात राजस्थानमध्ये संघटनेत बदल करावा ही प्रमुख मागणी होती. तसेच मंत्रिमंडळ बदल आणि पक्षात पायलट यांची भूमिका यावर चर्चा झाली.

सचिन पायलट समर्थकांचा दावा आहे की, राजस्थानात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पायलट यांना संधी द्यावी. त्यानंतर अशोक गहलोत मंत्रिमंडळात फेरबदल करून संघटनेच्या काही महिन्यात बदल करण्यात यावेत. पार्टी हायकमांडही गहलोत मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची सुट्टी करून नवी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या बदलासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि पुन्हा कार्यालयीन कामकाजाच्या सुरु होण्याची पक्ष वाट पाहतोय.

प्रमोद कृष्णन यांच्या ट्विटनं वाढवली उत्सुकता

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी स्पष्ट केलंय की, अशोक गहलोत बरे झाल्यानंतर राजस्थानात बदल करणार आहोत. काय करायचं हे सगळं तयार आहे. प्रियंका गांधी यांच्या जवळचे सहकारी आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एका ट्विटमधून संकेत दिलेत की, पंजाबमधील वारं राजस्थान आणि छत्तीसगडमधील वातावरण बिघडवू शकतात. परंतु AICC मधल्या सूत्रांचा दावा आहे की, पंजाबप्रमाणे राजस्थानात कुठलेही मोठे बदल पुढील वर्ष मार्चपर्यंत केले जाणार नाहीत. परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाईल. मात्र संघटनेत आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येतील असं त्यांनी दावा केला.  

टॅग्स :PunjabपंजाबSachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान