शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:50 IST

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून भाजपाने ३ राज्यांचे मुख्यमंत्री बदलले त्यानंतर आता काँग्रेसदेखील हीच रणनीती वापरताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री बदलून नवं धक्कातंत्र वापरलं आता राजस्थान काँग्रेसमध्येही हेच घडणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या २ दिवसांपासून राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट दिल्ली दरबारी आहेत. याठिकाणी पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली. पायलट आणि राहुल गांधी यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे कारण राजस्थानात बंडखोरी केल्यानंतर मागील १ वर्षात पहिल्यांदाच सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. या भेटीत ३ मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यात राजस्थानमध्ये संघटनेत बदल करावा ही प्रमुख मागणी होती. तसेच मंत्रिमंडळ बदल आणि पक्षात पायलट यांची भूमिका यावर चर्चा झाली.

सचिन पायलट समर्थकांचा दावा आहे की, राजस्थानात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पायलट यांना संधी द्यावी. त्यानंतर अशोक गहलोत मंत्रिमंडळात फेरबदल करून संघटनेच्या काही महिन्यात बदल करण्यात यावेत. पार्टी हायकमांडही गहलोत मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची सुट्टी करून नवी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या बदलासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि पुन्हा कार्यालयीन कामकाजाच्या सुरु होण्याची पक्ष वाट पाहतोय.

प्रमोद कृष्णन यांच्या ट्विटनं वाढवली उत्सुकता

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी स्पष्ट केलंय की, अशोक गहलोत बरे झाल्यानंतर राजस्थानात बदल करणार आहोत. काय करायचं हे सगळं तयार आहे. प्रियंका गांधी यांच्या जवळचे सहकारी आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एका ट्विटमधून संकेत दिलेत की, पंजाबमधील वारं राजस्थान आणि छत्तीसगडमधील वातावरण बिघडवू शकतात. परंतु AICC मधल्या सूत्रांचा दावा आहे की, पंजाबप्रमाणे राजस्थानात कुठलेही मोठे बदल पुढील वर्ष मार्चपर्यंत केले जाणार नाहीत. परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाईल. मात्र संघटनेत आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येतील असं त्यांनी दावा केला.  

टॅग्स :PunjabपंजाबSachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान