बारवरील पोलीस छाप्यानंतर पत्रकाराचा गूढ मृत्यू
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
दोघे जखमी : वृत्तांकन केल्याच्या रागातून झाला हल्ला

बारवरील पोलीस छाप्यानंतर पत्रकाराचा गूढ मृत्यू
द घे जखमी : वृत्तांकन केल्याच्या रागातून झाला हल्लाभाईंदर : पोलीस चौकीला लागून असलेल्या एका बारवर पोलिसांनी गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्याचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या तीन पत्रकारांवर बारचालकासह सुमारे २० ते ३० कर्मचार्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, तिसर्याने पोलीस चौकीचा आसरा घेतल्याने तो बचावला. तर, चौकीपासूनच काही अंतरावर चौथ्या पत्रकाराचा मृतदेह शुक्रवारी पहाटे आढळला.व्हाइट हाउस बारवर पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती स्थानिक पत्रकार संतोष मिश्रा यांना मिळाली. त्यानुसार मिश्रासह पत्रकार शशी शर्मा आणि अनिल नोटीयाल हे वृत्तांकनासाठी तेथे गेले. पोलीस बारबालांना ताब्यात घेत असताना हे तिघे वृत्तांकन करीत होते. हे पाहून बारचालक गणेश कामत याने दारूने भरलेला ग्लास मिश्रा यांना फेकून मारला. त्यानंतर बारमधील इतर कर्मचार्यांनी त्या तिघांवर हल्लाबोल केला. मिश्राने जीव वाचविण्यासाठी काशिमीराच्या दिशेने तर शर्माने मीरा रोडच्या दिशेने पळ काढला. नोटीयालने लगतच्या चौकीचा आसरा घेतल्याने तो बारवाल्यांच्या तावडीतून बचावला. जखमी अवस्थेत शर्मा याने मीरा रोड पोलीस ठाणे गाठून उपअधीक्षक सुहास बावचे यांना घटनेची माहिती दिली. मिश्राचा संपर्क होत नसल्याने बावचे यांनी पत्रकार राघवेंद्र दुबे याला संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलवले. दुबे पहाटे ५च्या सुमारास काही पत्रकारांसह घटनेच्या ठिकाणी गेला. तेथून दुबे एकटा पोलीस चौकीच्या दिशेने निघाल्यानंतर पहाटे ५.३० वा.च्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच परिसरात आढळला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून बारचालक कामत, त्याचा ड्रायव्हर राजू, कर्मचारी शरद, मुकेश, दिनेश व इतर ६ ते ७ जणांसह १४ बारबालांना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)