शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कारगिल विजयाची २१ वर्षे! पाकिस्तानला पिटाळले आता लडाखमधून चीनलाही हाकलू या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 5:55 AM

देदीप्यमान कारगिल विजयाची २१ वर्षे पूर्ण

निनाद देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कारगील युद्धात भारताने विजय मिळविला, त्याला रविवार, २६ जुलैला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या २१ वर्षांत पाकिस्तानने भारतात अनेक अतिरेकी कारवाया केल्या, परंतु रणांगणात भारत पाकिस्तानला कायम वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाठीमागून हल्ला करण्याचीच पाकची निती आहे. आता पाकिस्तानपेक्षा भारताला खराखुरा सामना करावा लागणार आहे चीनशीच.

चीनने आता लडाख भगत जशी घुसखोरी केली, तशीच पाकिस्तानने १९९९ साली कारगिलमध्ये केली होती. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या संपूर्ण मोहिमेला आॅपरेशन विजय नाव दिले होते. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये पाकिस्तान घुसखोरी करीत असल्याचे मेंढपाळांना दिसले. पाकने १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता.

घुसखोरांना परत माघारी धाडण्यासाठी लष्कराने ‘आॅपरेशन विजय’ मोहीम आखली. डोंगराळ प्रदेश असल्याने भारतीय जवांना अनेक अडचणी आल्या. मात्र, बोफोर्स तोफांचा मारा करत तसेच थेट उंचपर्वत रांगा सर करत भारतीय जवानांनी हे युद्ध जिंकले. भारतीय वायुसेनेकडूनही ‘आॅपरेशन सफेद सागर’ सुरू केले. या आॅपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे नसतांनाही वायुदलाने मोठी भूमिका बजावली.संरक्षण दलात आमूलाग्र बदलया युद्धानंतर आढावा समितीच्या शिफारशीनुसार देशाच्या संरक्षण दलांत अनेक बदल केले. मात्र, आता सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल. आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण पास्किस्तानला केंद्रबिंदू धरून होते. मात्र, पाकिस्तानपेक्षा चीन ही भारताची खरी दुखरी नस असून त्यादृष्टीने व्यवरचनात्मक आणि राजनैतिक पातळीवर बदल करने गरजेचे आहे.पाकिस्तानचे सैन्य भारतात घुसलेच कसे, असा प्रश्न विचारत त्या वेळी गुप्तचर विभागावर दोष ठेवण्यात आले होते. भारतीय जवानांनी भूभाग परत मिळवला. मात्र, त्यानंतर के. सुब्रम्हण्यम समितीने परराष्ट्र व संरक्षण धोरणात अनेक बदल सुचवले. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व चीफ आॅफ डिफेन्स स्टाफची निर्मिती झाली. गुप्तचर यंंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काही बदल केले गेले.

पण आता पाकिस्तान नव्हे, तर चीन शत्रू म्हणून सीमेवर उभा आहे. त्या दृष्टीने संरक्षण सिद्धतेत वाढ करण्याची गरज आहे. भारताने गेल्या काही वर्षात फॉरवर्ड डिप्लोमसी अंगीकारली आहे. पाकला सडेतोड उत्तर दिले. मात्र, आता हीच भूमिका चीनबाबत घ्यायची आहे. लष्करी क्षमतांच्या तुलनेत चीन भारतापेक्षा बराच पुढे आहे. त्यामुळे युध्दाची तयारी ठेवत भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर चीनच्या व्यूवरचनेचा अभ्यास करून त्यांना शह द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनchinaचीनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान