शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 17:03 IST

आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देभारताचे हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते.आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

 नवी दिल्ली : गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही आणि गलवानमध्ये आपल्या जवानांनी हे सिद्धही केले आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

विविध माध्यमांत छापून आलेल्या वृत्तांनुसार, गलवानमध्ये चीनने दिलेल्या धोक्यानंतर, भारतीय जवानांनी सावध नसतानाही चीनचे जवळपास 40 जवान मारले. आता भारताने पेंगाँग त्सो सरोवरापासून ते गलवान खोऱ्यापर्यंत आपले खास जवान चीनी सैनिकांना टक्कर देण्यासाठी तैनात केले आहेत. या जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताचे 'पहाडी योध्ये' -हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ट स्थरावरील अधिकृत सूत्रांनी सांगितले, की चीनी सैनिकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख उत्तर देण्याचे आदेश भारतीय जवानांना देण्यात आले आहेत. बोलले जाते, की या जवानांना गेल्या दशकांत उत्तरेकडील फ्रंटवर लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते. आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

'सर्वात खडतर लढाईसाठी दिले जाते प्रशिक्षण' -एका माजी लष्कर प्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे, पहाडांवरील लढाई सर्वात अवघड असते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्किममध्ये या जवानांपूढे कुणाचाही टिकाव लागू शकत नाही.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

पहाडांमध्ये भारताची आघाडी -चीन संबंधातील एका तज्ज्ञाने म्हटले आहे, चीनच्या ताब्यात असलेली तिबेटमधील पठारे सपाट आहेत. तर भारतातील पठारे उंच आहेत. पहाडी भागांवर कबजा करणे जेवढे अवघड तेवढेच तो टिकवणेही अवघड असते.

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

भारत-चीन हवाई ताकद -चीनकडे भारतात कोठेही डागले जाऊ शकतात, असे 104 न्युक्लिअर मिसाइल्स आहेत. मात्र, असे असले तरी आपल्याकडेही अग्नि 3 लॉन्चर सिस्टम आहे. जिच्या सहाय्याने भारतही संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यात हल्ला चढवू शकतो. एवढेच नाही, तर भारताकडे अन्विक क्षमता असलेली 51 विमानं आहेत. जे ग्रॅव्हिटी बॉम्बने सुसज्ज आहेत. या शिवायही भारताची  हवाई ताकद फार मोठी आहे. 

 

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक