शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही जीबीएसचा प्रादुर्भाव, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:52 IST

जीबीएसमुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथील आरोग्य विभागाने अद्याप मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. 

गेल्या काही दिवसांपासून देशात गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) म्हणजेच जीबीएस आजाराचा कहर सतत वाढत आहे. हा आजार आता राज्या-राज्यात पसरू लागला आहे. महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. तर जीबीएसमुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथील आरोग्य विभागाने अद्याप मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये उत्तर २४ परगणा येथील जगद्दल येथील रहिवासी देबकुमार साहू (१०), अमडंगा येथील रहिवासी अरित्र मनाल (१७) आणि हुगळी जिल्ह्यातील धनियाखली गावातील ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. देबकुमार साहू याचे २६ जानेवारीला कोलकात्याच्या बीसी रॉय हॉस्पिटलमध्ये निधन झाले, तर शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमडंगा येथील अरित्र मनाल यांचे दुसऱ्या दिवशी निधन झाले. हुगळी येथील व्यक्तीचा बुधवारी तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 

देबकुमार साहू याचे काका गोविंद साहू म्हणाले की, हॉस्पिटलद्वारे आम्हाला सांगितले आले नाही की, त्याचा मृत्यू जीबीएसमुळे झाला. परंतु त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात जीबीएसचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जीबीएसने ग्रस्त असलेल्या आणखी चार मुलांवर बीसी रॉय हॉस्पिटल आणि चाइल्ड हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण पुण्यातमहाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये हा आजार पसरला आहे. आतापर्यंत जीबीएसमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, या आजाराने ग्रस्त २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. दरम्यान, बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रwest bengalपश्चिम बंगाल