शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही जीबीएसचा प्रादुर्भाव, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:52 IST

जीबीएसमुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथील आरोग्य विभागाने अद्याप मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. 

गेल्या काही दिवसांपासून देशात गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) म्हणजेच जीबीएस आजाराचा कहर सतत वाढत आहे. हा आजार आता राज्या-राज्यात पसरू लागला आहे. महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. तर जीबीएसमुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथील आरोग्य विभागाने अद्याप मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये उत्तर २४ परगणा येथील जगद्दल येथील रहिवासी देबकुमार साहू (१०), अमडंगा येथील रहिवासी अरित्र मनाल (१७) आणि हुगळी जिल्ह्यातील धनियाखली गावातील ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. देबकुमार साहू याचे २६ जानेवारीला कोलकात्याच्या बीसी रॉय हॉस्पिटलमध्ये निधन झाले, तर शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमडंगा येथील अरित्र मनाल यांचे दुसऱ्या दिवशी निधन झाले. हुगळी येथील व्यक्तीचा बुधवारी तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 

देबकुमार साहू याचे काका गोविंद साहू म्हणाले की, हॉस्पिटलद्वारे आम्हाला सांगितले आले नाही की, त्याचा मृत्यू जीबीएसमुळे झाला. परंतु त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात जीबीएसचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जीबीएसने ग्रस्त असलेल्या आणखी चार मुलांवर बीसी रॉय हॉस्पिटल आणि चाइल्ड हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण पुण्यातमहाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये हा आजार पसरला आहे. आतापर्यंत जीबीएसमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, या आजाराने ग्रस्त २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. दरम्यान, बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रwest bengalपश्चिम बंगाल