शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता या राज्यात काँग्रेसला तगडा धक्का बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 11:25 IST

पक्षश्रेष्ठींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असून, येथीली माजी खासदार तसेच काही माजी मंत्री योग्य संधी आणि वेळेची वाट पाहत आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच आता दिल्लीमध्येही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे समोर आले आहे प्रभावी नेतृत्वाचा अभाव असलेल्या काँग्रेसची दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दाणादाण उडाली होती. दिल्लीतील पालिका निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वी पालिका राजकारणातील काँग्रेसचे बडे नेते आपची वाट धरण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली - देशाच्या सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला सध्या एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील सत्ता बंडखोरीमुळे गमवावी लागल्यानंतर सध्या काँग्रेसमोर राजस्थानमधील सत्ता टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच आता अजून एका राज्यामध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच आता दिल्लीमध्येही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे समोर आले आहे. पक्षश्रेष्ठींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असून, येथीली माजी खासदार तसेच काही माजी मंत्री योग्य संधी आणि वेळेची वाट पाहत आहेत. तर दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते पुढच्या काही काळात काँग्रेसचा हात सोडून अन्य कुठल्याही पक्षात देरेदाखल होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भातील वृत्त दैनिक जागरणने प्रसारित केले आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यानंतर दिल्लीत कमकुवत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात उत्साह आला होता. त्याचा परिणाम २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला होता. त्यावेळी काँग्रेसने दिल्लीतील आपली स्थिती सुधारून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. मात्र शीला दीक्षित यांचे आकस्मिक निधन झाल्याने काँग्रेसला धक्का बसला.

प्रभावी नेतृत्वाचा अभाव असलेल्या काँग्रेसची दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दाणादाण उडाली. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ चार टक्के मते मिळाली. दरम्यान, सध्या युवा नेते अनिल चौधरी यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही.

अशा परिस्थितीत दिल्लीतील सर्व नामांकित माजी आमदार, मंत्री आणि माजी खासदार आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्याकडून योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील पालिका निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वी पालिका राजकारणातील काँग्रेसचे बडे नेते आपची वाट धरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या सुरात सूर मिसळून दिल्ली काँग्रेसमध्ये सारे काही  आलबेल नसल्याचे संकेत दिले आहे. सध्या पक्षातून निलंबित असलेले महाबल मिश्रा यांनी पक्षामध्ये वरिष्ठांकडून ज्येष्ठ नेत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगितले. कुणाच्याही तक्रारी किंवा समस्या ऐकून घेतल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्लीPoliticsराजकारण