शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अभियंत्यांनो परत फिरा रे; सेमीकंडक्टर चिपला बळ द्या रे! सरकारला आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 9:52 AM

विदेशातील कंपन्यांमध्ये अनेक भारतीय उच्च पदावर

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्सनंतर आता भारत सरकारचा भर देशाला सेमीकंडक्टर हब बनविण्यावर आहे. विदेशी सेमीकंडक्टर कंपन्यांना देशात आकर्षित करण्यासाठी सरकारने १० अब्ज डॉलर्सच्या इन्सेटिव्हची घोषणा केली आहे. त्यामुळे आशिया आणि अमेरिकेत काम करणारे हजारो भारतीय अभियंते मायदेशी परततील आणि देशातील नवीन हाय-टेक क्रांतीमध्ये सहभागी होतील, अशी सरकारला आशा आहे. 

सेमीकंडक्टर कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारने हा अंदाज वर्तविला आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, जगभरातील सेमी कंडक्टर कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणारे २० ते २५ टक्के हे भारतीय आहेत. त्यापैकी बरेच जण भारतात परततील, अशी आम्हाला आशा आहे.

काय आहेत आव्हाने? जगातील बहुतांश अभियंते हे भारतातून येतात पण त्यांना सेमी कंडक्टर बनवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे कंपन्यांना जगभरातील अनेक प्रतिभावंतांना भारतात आणावे लागेल आणि येथेही प्रतिभावंत निर्माण करावे लागतील. अनुभवी प्रशिक्षित अभियंत्यांचा अभाव, भारतातील गुंतागुंतीची प्रशासकीय रचना आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या आयातीवरील उच्च शुल्कामुळे तैवानच्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करू शकतात. एक-दोन कंपन्या आल्याने सेमी कंडक्टर क्षेत्राला गती मिळणार ना. आयसी डिझाईन, चाचणी, पॅकेजिंग आणि साहित्य पुरवठा यासह संपूर्ण पुरवठा साखळी भारतात यावी लागेल, तरच या क्षेत्रात भारताला यश मिळेल.