शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:54 IST

Court on Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा रस्त्यावरून चालत जाणारे लोक, रहिवासी, स्कूटरस्वार जखमी झालेले आहेत. अपघात झालेले आहेत. लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडलेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीतील निर्णयानंतर राजस्थानच्याउच्च न्यायालयाने देखील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान हायकोर्टाने देखील भटक्या कुत्र्यांमुळे आणि पशुंमुळे वाढत चाललेल्या धोक्यावर स्वत: दखल घेत हे निर्देश जारी केले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात विशेषकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरांत अशाप्रकारचे आदेश जारी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा रस्त्यावरून चालत जाणारे लोक, रहिवासी, स्कूटरस्वार जखमी झालेले आहेत. अपघात झालेले आहेत. लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडलेले आहेत. यामुळे रेबिज वाढत चालला आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाला त्याचा बाप मांडीवर घेऊन असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मुलगा कुत्र्यासारखा भुंकत, ओरडत होता. त्या मुलाने बापाच्या मांडीवर प्राण सोडले होते. तक्रारी केल्या तरी पालिका प्रशासन अशा भटक्या कुत्र्यांवर काहीच कारवाई करत नाही, यामुळे आता न्यायालयेच स्वत: दखल घेऊ लागली आहेत. 

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या वाढत्या धोक्याची स्वतःहून दखल घेतली. बातम्यांची दखल घेत सरकारला अ‍ॅमिकस क्युरीच्या अहवालावर उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. न्यायमूर्ती कुलदीप माथूर आणि न्यायमूर्ती रवी चिरानिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील डॉ. सचिन आचार्य, वकील प्रियंका बोराणा आणि वकील हेली पाठक यांनी आपली बाजू मांडली. 

नागरिकांच्या सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे हे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित संस्थांचे वैधानिक कर्तव्य आहे असे वकिलांनी म्हटले. वैधानिक कर्तव्या असूनही, संबंधित अधिकाऱ्यांच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि कर्तव्यांचे पालन न केल्यामुळे, भटक्या प्राण्यांकडून हल्ले आणि चावण्याच्या घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील मानवी जीवनाला धोका निर्माण होत आहेच, शिवाय देशभरातूनच नव्हे तर जगभरातील विविध देशांमधून येणाऱ्या पर्यटकांवर हल्ले झाल्याने राज्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे एम्स जोधपूरने प्रियंका बोराना यांना आपल्या कर्मचाऱ्यांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याचे पत्र लिहून कळविले होते. याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने अखेर कोर्टाने याची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत. शहरातील रस्त्यांवरून भटके कुत्रे आणि इतर प्राणी हटविण्यासाठी मोहिम सुरु करण्यास सांगतिले आहे. तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका हेल्पलाइन नंबर-ईमेल आयडी जारी करण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :dogकुत्राHigh Courtउच्च न्यायालयRajasthanराजस्थान