शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:54 IST

Court on Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा रस्त्यावरून चालत जाणारे लोक, रहिवासी, स्कूटरस्वार जखमी झालेले आहेत. अपघात झालेले आहेत. लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडलेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीतील निर्णयानंतर राजस्थानच्याउच्च न्यायालयाने देखील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान हायकोर्टाने देखील भटक्या कुत्र्यांमुळे आणि पशुंमुळे वाढत चाललेल्या धोक्यावर स्वत: दखल घेत हे निर्देश जारी केले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात विशेषकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरांत अशाप्रकारचे आदेश जारी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा रस्त्यावरून चालत जाणारे लोक, रहिवासी, स्कूटरस्वार जखमी झालेले आहेत. अपघात झालेले आहेत. लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडलेले आहेत. यामुळे रेबिज वाढत चालला आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाला त्याचा बाप मांडीवर घेऊन असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मुलगा कुत्र्यासारखा भुंकत, ओरडत होता. त्या मुलाने बापाच्या मांडीवर प्राण सोडले होते. तक्रारी केल्या तरी पालिका प्रशासन अशा भटक्या कुत्र्यांवर काहीच कारवाई करत नाही, यामुळे आता न्यायालयेच स्वत: दखल घेऊ लागली आहेत. 

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या वाढत्या धोक्याची स्वतःहून दखल घेतली. बातम्यांची दखल घेत सरकारला अ‍ॅमिकस क्युरीच्या अहवालावर उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. न्यायमूर्ती कुलदीप माथूर आणि न्यायमूर्ती रवी चिरानिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील डॉ. सचिन आचार्य, वकील प्रियंका बोराणा आणि वकील हेली पाठक यांनी आपली बाजू मांडली. 

नागरिकांच्या सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे हे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित संस्थांचे वैधानिक कर्तव्य आहे असे वकिलांनी म्हटले. वैधानिक कर्तव्या असूनही, संबंधित अधिकाऱ्यांच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि कर्तव्यांचे पालन न केल्यामुळे, भटक्या प्राण्यांकडून हल्ले आणि चावण्याच्या घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील मानवी जीवनाला धोका निर्माण होत आहेच, शिवाय देशभरातूनच नव्हे तर जगभरातील विविध देशांमधून येणाऱ्या पर्यटकांवर हल्ले झाल्याने राज्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे एम्स जोधपूरने प्रियंका बोराना यांना आपल्या कर्मचाऱ्यांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याचे पत्र लिहून कळविले होते. याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने अखेर कोर्टाने याची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत. शहरातील रस्त्यांवरून भटके कुत्रे आणि इतर प्राणी हटविण्यासाठी मोहिम सुरु करण्यास सांगतिले आहे. तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका हेल्पलाइन नंबर-ईमेल आयडी जारी करण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :dogकुत्राHigh Courtउच्च न्यायालयRajasthanराजस्थान