शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 08:50 IST

मेघालय उच्च न्यायालयाने राजाजू आणि डिएंगनागाव गावांमधून कोळसा गायब झाल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले होते.

मेघालयमधून मोठा कोळसा घोटाळा समोर येत आहे. थोडा थोडका नव्हे तर ४००० टन कोळसा गायब झाला आहे. यावरून हायकोर्टाने फटकारताच राज्याच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात जसे खेकड्यांनी धरण पोखरल्याचे कारण सांगितले गेले, तसे हास्यास्पद कारण दिले आहे. हजारो टन कोळसा म्हणजे पावसाच्या पाण्यात वाहून गेला असेल असे मेघालयच्या मंत्र्यांनी म्हटले आहे. 

सोमवारी माध्यमांशी बोलताना उत्पादन शुल्क मंत्री किरमेन शिल्ला यांनी हायकोर्टाच्या निर्देशांवर हे वक्तव्य केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असतानाच या कोळशाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

मेघालय उच्च न्यायालयाने राजाजू आणि डिएंगनागाव गावांमधून कोळसा गायब झाल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले होते. तसेच बेकायदेशीरपणे कोळसा उचलणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने कोळशाचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

यावर शिल्ला यांनी दावे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत आणि अशा कारवायांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अनेक विभागांची आहे. जर आपल्या लोकांना जगण्यासाठी हे करावे लागत असेल तर ते बेकायदेशीरपणे चोरी करू शकतात असे मला वाटते. अन्यथा कोणीही राज्याचे नुकसान करेल असे वाटत नाही. मी फक्त पावसाला दोष देऊ शकत नाही. पावसात वाहून गेला ते खरे असू शकते, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटCourtन्यायालय