शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

पाटलांपाठोपाठ फडणवीसही दिल्लीत, 'मनसे' भेटीची चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:07 IST

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

नवी दिल्ली - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यापाठोपाठ विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही (devendra fadnavis) राजधानी दिल्लीत पोहचले आहेत. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, फडणवीस दिल्लीला गेल्याने आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात दिल्लीत खलबतं होणार असल्याची चर्चा आहे. तसेच, मनसे आणि भाजपा एकत्र येईल का, यावरही राज्यात चर्चा रंगली आहे. 

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते. एकीकडे विधानपरिषद निवडणुका आणि दुसरीकडे राज ठाकरेंच्या भेटीने मनसेसोबत युती या विषयावर चर्चा होणार का, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर, दिल्लीत फडणवीस हे मोदींना भेटणार का याचीही चर्चा होत आहे.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (ता.२५) नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर सांगितलं. तसेच, राज्यातील सद्यस्थिती आणि आगामी महापालिका निवडणुकांबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत, त्यामुळे आज पुन्हा एकदा राज्यातील राजकीय खलबतं राजधानीत रंगणार आहेत. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याची राज्यभर चर्चा होत आहे. 

मुंबईत बिनविरोध, इतर ठिकाणी काय?

मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तेथे एक जागा शिवसेनेकडे आणि एक जागा भाजपकडे आहे. याच पद्धतीने उर्वरित जागा बिनविरोध करण्यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. नागपूर आणि धुळे या दोन जागा भाजप एकतर्फी जिंकणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. म्हणूनच काँग्रेस आणि भाजपने केवळ लढाई करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्याची चर्चा आहे.

कोल्हापूरचे काय ?

कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहता भाजपने निर्णय घेतल्यास महाडिक काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. जर दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर हीच लढाई पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी माघारीच्या दुपारी तीनपर्यंत साऱ्यांचे लक्ष दिल्ली, मुंबईतील निरोपाकडे राहणार आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाह