शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
4
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
5
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
6
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
7
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
8
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
9
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
10
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
11
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
12
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
13
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
14
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
15
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
16
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
17
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
18
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
19
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
20
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार

रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:55 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Ashwini Vaishnaw Budget 2024: लोकसभेत मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला. रोजगार आणि ग्रामीण विकासावर अधिक खर्च करण्याबरोबरच काही राज्यांना अधिक पैसा देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा केलेली नसली तरी यासाठी २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्यासोबत रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी १५ हजार ५११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर ८३ मिनिटे भाषण केले. पण या सगळ्यात रेल्वेचे नाव फक्त एकदाच ऐकायला मिळाले. त्यामुळे रेल्वेसाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंदाची बातमी दिली. "रेल्वे सध्या अडीच हजार नॉन-एसी डबे बनवत आहे आणि येत्या तीन वर्षांत आणखी दहा हजार अतिरिक्त नॉन-एसी डबे बनवले जातील. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत सुरक्षितपणे प्रवास करता यावा हा रेल्वेचा उद्देश आहे. या गाड्या हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी ४५० रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या सुविधा देणार आहेत," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

"२०१४ पूर्वी रेल्वेसाठी भांडवली खर्चावरील गुंतवणूक सुमारे ३५,००० कोटी रुपये होती. आज ती २.६२ लाख कोटी रुपये आहे. रेल्वेसाठी हा विक्रमी भांडवली खर्च आहे. रेल्वेत अशा गुंतवणुकीसाठी मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचा खूप आभारी आहे. २०१४ पूर्वीची ६० वर्षे पाहिल्यास, ट्रॅकची क्षमता आहे की नाही याची खात्री न करता नवीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या अवस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या पूर्णपणे लोकप्रिय उपाययोजना केल्या गेल्या. मात्र गेल्या १० वर्षांमध्ये पाया योग्यरित्या घातला गेला आहे याची खात्री करण्यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे," असे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

"आतापर्यंत ४०,००० किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तर ३१,००० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. २०१४ पूर्वीचे विद्युतीकरण पाहिले तर ६० वर्षांत २०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण झाले होती. केवळ १० वर्षात ४०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ट्रॅक बांधणीचा वेग बघितला तर २०१४ मध्ये तो फक्त चार किमी प्रतिदिन होता तर गेल्या आर्थिक वर्षात तो १४.५ किमी प्रतिदिन होता. प्रवाशांच्या सुरक्षेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. मागील वर्षी सुरक्षेशी संबंधित उपक्रमांमध्ये ९८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, या वर्षी सुरक्षेशी संबंधित उपाय योजनांसाठी १,०८,००० कोटी रुपयांची तरतूद आहे," असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे