शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:55 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Ashwini Vaishnaw Budget 2024: लोकसभेत मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला. रोजगार आणि ग्रामीण विकासावर अधिक खर्च करण्याबरोबरच काही राज्यांना अधिक पैसा देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा केलेली नसली तरी यासाठी २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्यासोबत रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी १५ हजार ५११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर ८३ मिनिटे भाषण केले. पण या सगळ्यात रेल्वेचे नाव फक्त एकदाच ऐकायला मिळाले. त्यामुळे रेल्वेसाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंदाची बातमी दिली. "रेल्वे सध्या अडीच हजार नॉन-एसी डबे बनवत आहे आणि येत्या तीन वर्षांत आणखी दहा हजार अतिरिक्त नॉन-एसी डबे बनवले जातील. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत सुरक्षितपणे प्रवास करता यावा हा रेल्वेचा उद्देश आहे. या गाड्या हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी ४५० रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या सुविधा देणार आहेत," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

"२०१४ पूर्वी रेल्वेसाठी भांडवली खर्चावरील गुंतवणूक सुमारे ३५,००० कोटी रुपये होती. आज ती २.६२ लाख कोटी रुपये आहे. रेल्वेसाठी हा विक्रमी भांडवली खर्च आहे. रेल्वेत अशा गुंतवणुकीसाठी मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचा खूप आभारी आहे. २०१४ पूर्वीची ६० वर्षे पाहिल्यास, ट्रॅकची क्षमता आहे की नाही याची खात्री न करता नवीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या अवस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या पूर्णपणे लोकप्रिय उपाययोजना केल्या गेल्या. मात्र गेल्या १० वर्षांमध्ये पाया योग्यरित्या घातला गेला आहे याची खात्री करण्यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे," असे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

"आतापर्यंत ४०,००० किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तर ३१,००० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. २०१४ पूर्वीचे विद्युतीकरण पाहिले तर ६० वर्षांत २०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण झाले होती. केवळ १० वर्षात ४०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ट्रॅक बांधणीचा वेग बघितला तर २०१४ मध्ये तो फक्त चार किमी प्रतिदिन होता तर गेल्या आर्थिक वर्षात तो १४.५ किमी प्रतिदिन होता. प्रवाशांच्या सुरक्षेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. मागील वर्षी सुरक्षेशी संबंधित उपक्रमांमध्ये ९८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, या वर्षी सुरक्षेशी संबंधित उपाय योजनांसाठी १,०८,००० कोटी रुपयांची तरतूद आहे," असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे