शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अतुल सुभाषनंतर आता पत्नीच्या छळाला कंटाळून हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या; शहरात दुसरी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 00:10 IST

हुलीमावू पोलीस स्टेशनचे (कायदा व सुव्यवस्था) ३३ वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने शुक्रवारी रात्री उशिरा बायप्पानहल्ली येथे ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

नुकतीच बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच शहरात आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे.

हुलीमावू पोलीस स्टेशनचे (कायदा व सुव्यवस्था) ३३ वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने शुक्रवारी रात्री उशिरा बायप्पानहल्ली येथे ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. थिप्पण्णा अलुगुर असे मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव असून त्यांनी कन्नडमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी पार्वती आणि तिचे वडील यमुनाप्पा यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. थिप्पण्णा अलुगुर हे उत्तर कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी शहराजवळील हंडीगानुरू गावचे रहिवासी होते.

वृत्तानुसार, थिप्पण्णा अलुगुर यांचे तीन वर्षांपूर्वी पार्वतीसोबत लग्न झाले होते आणि ते बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.  थिप्पण्णा अलुगुर हे शुक्रवारी घरी परतण्यापूर्वी पहिली शिफ्ट (सकाळी ८ ते दुपारी २) करण्यासाठी गेले होते. यानंतर सायंकाळी पार्वतीसोबत जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. थिप्पण्णा अलुगुर यांच्या सुसाईड नोटनुसार, रात्री काही वेळानंतर सासरे यमुनाप्पा यांनी थिप्पण्णा अलुगुर यांना फोन केला आणि धमकावले. 

प्राथमिक तपासात थिप्पण्णा अलुगुर यांनी हीलालिगे रेल्वे स्थानक ते कार्मेलरम रेल्वे फाटका दरम्यानच्या रुळांवर रेल्वेसमोर उडी मारल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, थिप्पण्णा अलुगुर यांनी हे भयानक पाऊल उचलले, तेव्हा ते वर्दीत होते.

साईड नोटमध्ये काय म्हटलं आहे?थिप्पण्णा अलुगुर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, "माझी पत्नी पार्वती आणि तिचे वडील यमुनाप्पा यांच्या छळामुळे मी आत्महत्या करत आहे. १२ डिसेंबर रोजी त्यांनी (यमुनाप्पा) मला ७.२७ वाजता फोन केला, १४ मिनिटे बोलले पण यादरम्यान त्यांनी मला धमकावले. तसेच, त्यांनी मला मरण्यास सांगितले. जेणेकरून त्याची मुलगी (पार्वती) शांततेत जगू शकेल." दरम्यान, बायप्पनाहल्ली रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १०८, ३१(३) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस