शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 10:54 IST

सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.

ठळक मुद्देमिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेनतो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेनतुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग

मुंबई - बॉलीवडू अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता दीड महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. या काळात सुशांतच्या आत्महत्येचं गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललं असून, या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहारमधील पोलीस आमने-सामने आले आहेत, तसेच दोन्ही राज्यांतील सरकारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.

सुशांत सिंह राजपूतची बहीण राणी हिने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या भावाला राखी बांधू शकणार नाही, याचं दु:ख तिच्या या पत्रातून व्यक्त झालं आहे. या पत्रात ती म्हणते , ‘’आज माझा दिवस आहे, आज तुझा दिवस आहे, आज आपला दिवस आहे. आज रक्षाबंधन आहे. पण पस्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवाही जळतोय, हळद-चंदनाचा टिळापण हे. मिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेन, ते ललाट नाही ज्याच्यावर मी टिळा लावेन, तो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेन. तो भाऊ नाही ज्याची गळाभेट घेईन.’’

 ‘’अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तू आमच्या जीवनाच आला होता तेव्हा आयुष्य उजळून निघाले होते. तू होतास तेव्हा जीवनाच प्रकाशच प्रकाश होता. आता तू या जगात नाही. मला कळत नाही आहे की मी काय करू? तुझ्याशिवाय मला जगता येत नाही आहे. असं कधी होईल, असा विचारही केला नव्हता. हा दिवस येईल पण तू नसशील, असं कधी वाटलं नव्हतं. तुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग,’’

तुझीच

राणी दी

दरम्यान, सुशांतच्या जाण्यामुळे त्याच्या बहिणी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे या आत्महत्या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे. तर तपासावरून मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले आहेत. तर सुशांतचे कुटुंबीय आपल्याला न्याय आणि सीबीआय तपासाची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRaksha Bandhanरक्षाबंधनbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईBiharबिहार