शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 10:54 IST

सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.

ठळक मुद्देमिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेनतो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेनतुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग

मुंबई - बॉलीवडू अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता दीड महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. या काळात सुशांतच्या आत्महत्येचं गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललं असून, या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहारमधील पोलीस आमने-सामने आले आहेत, तसेच दोन्ही राज्यांतील सरकारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.

सुशांत सिंह राजपूतची बहीण राणी हिने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या भावाला राखी बांधू शकणार नाही, याचं दु:ख तिच्या या पत्रातून व्यक्त झालं आहे. या पत्रात ती म्हणते , ‘’आज माझा दिवस आहे, आज तुझा दिवस आहे, आज आपला दिवस आहे. आज रक्षाबंधन आहे. पण पस्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवाही जळतोय, हळद-चंदनाचा टिळापण हे. मिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेन, ते ललाट नाही ज्याच्यावर मी टिळा लावेन, तो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेन. तो भाऊ नाही ज्याची गळाभेट घेईन.’’

 ‘’अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तू आमच्या जीवनाच आला होता तेव्हा आयुष्य उजळून निघाले होते. तू होतास तेव्हा जीवनाच प्रकाशच प्रकाश होता. आता तू या जगात नाही. मला कळत नाही आहे की मी काय करू? तुझ्याशिवाय मला जगता येत नाही आहे. असं कधी होईल, असा विचारही केला नव्हता. हा दिवस येईल पण तू नसशील, असं कधी वाटलं नव्हतं. तुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग,’’

तुझीच

राणी दी

दरम्यान, सुशांतच्या जाण्यामुळे त्याच्या बहिणी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे या आत्महत्या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे. तर तपासावरून मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले आहेत. तर सुशांतचे कुटुंबीय आपल्याला न्याय आणि सीबीआय तपासाची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRaksha Bandhanरक्षाबंधनbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईBiharबिहार