शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"३० वर्षांनंतर देशात यादवी युद्ध सुरू होईल?’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने केला दावा, काँग्रेसने केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 14:30 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील समिकरणाचा हवाला देत देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी युद्ध सुरू होईल, असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा संदर्भ देत केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कैलाश विजयवर्गीय यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्याचं हे विधान बेजबाबदारपणाचं असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.  

इंदूरमध्ये रविवारी रक्षाबंधनाशी संबंधित एका कार्यक्रमामध्ये बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, सामाजिक समरसता ही आज खूप आवश्यक आहे. मी नुकताच लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्यांना भेटलो. ते सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रिय असतात. त्यांनी सांगितलं की, या देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी सुरू होईल. तसेच देशामधील लोकसंख्येचं समिकरण ज्या प्रकारे बदलत आहे ते पाहता ३० वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की, तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. 

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही याबाबत विचार आणि चिंतन करत आहोत. हिंदू शब्द कसाकाय भक्कम होईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही लोक इंग्रजांप्रमाणे फूट पाडा आणि राज्य करा असं धोरण राबवत आहेत. ते केवळ खुर्चीसाठी हिंदू धर्माला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही विजयवर्गीय यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, कैलाश विजयवर्गीय यांनी केलेलं विधान हे बेजबाबदारपणाचं आहे. ते देशात अस्थिरता आणि भीतीचं वातावरण निर्माण करणारं आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिकपणे जाहीर माफी मागितली पाहिजे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपा