शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"३० वर्षांनंतर देशात यादवी युद्ध सुरू होईल?’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने केला दावा, काँग्रेसने केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 14:30 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील समिकरणाचा हवाला देत देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी युद्ध सुरू होईल, असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा संदर्भ देत केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कैलाश विजयवर्गीय यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्याचं हे विधान बेजबाबदारपणाचं असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.  

इंदूरमध्ये रविवारी रक्षाबंधनाशी संबंधित एका कार्यक्रमामध्ये बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, सामाजिक समरसता ही आज खूप आवश्यक आहे. मी नुकताच लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्यांना भेटलो. ते सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रिय असतात. त्यांनी सांगितलं की, या देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी सुरू होईल. तसेच देशामधील लोकसंख्येचं समिकरण ज्या प्रकारे बदलत आहे ते पाहता ३० वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की, तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. 

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही याबाबत विचार आणि चिंतन करत आहोत. हिंदू शब्द कसाकाय भक्कम होईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही लोक इंग्रजांप्रमाणे फूट पाडा आणि राज्य करा असं धोरण राबवत आहेत. ते केवळ खुर्चीसाठी हिंदू धर्माला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही विजयवर्गीय यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, कैलाश विजयवर्गीय यांनी केलेलं विधान हे बेजबाबदारपणाचं आहे. ते देशात अस्थिरता आणि भीतीचं वातावरण निर्माण करणारं आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिकपणे जाहीर माफी मागितली पाहिजे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपा