शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

"३० वर्षांनंतर देशात यादवी युद्ध सुरू होईल?’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने केला दावा, काँग्रेसने केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 14:30 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील समिकरणाचा हवाला देत देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी युद्ध सुरू होईल, असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा संदर्भ देत केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कैलाश विजयवर्गीय यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्याचं हे विधान बेजबाबदारपणाचं असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.  

इंदूरमध्ये रविवारी रक्षाबंधनाशी संबंधित एका कार्यक्रमामध्ये बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, सामाजिक समरसता ही आज खूप आवश्यक आहे. मी नुकताच लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्यांना भेटलो. ते सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रिय असतात. त्यांनी सांगितलं की, या देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी सुरू होईल. तसेच देशामधील लोकसंख्येचं समिकरण ज्या प्रकारे बदलत आहे ते पाहता ३० वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की, तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. 

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही याबाबत विचार आणि चिंतन करत आहोत. हिंदू शब्द कसाकाय भक्कम होईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही लोक इंग्रजांप्रमाणे फूट पाडा आणि राज्य करा असं धोरण राबवत आहेत. ते केवळ खुर्चीसाठी हिंदू धर्माला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही विजयवर्गीय यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, कैलाश विजयवर्गीय यांनी केलेलं विधान हे बेजबाबदारपणाचं आहे. ते देशात अस्थिरता आणि भीतीचं वातावरण निर्माण करणारं आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिकपणे जाहीर माफी मागितली पाहिजे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपा