शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

100 वर्षांनंतर देवाचे घर झाले सर्वांसाठी खुले! दलित समाजाला मंदिरात मिळाला पूजेसाठी प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:43 IST

तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला.

तिरुवन्नमलाई : देवाचे घर सर्वांसाठी कायम खुले असते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला तामिळनाडूतमंदिरात प्रवेश मिळत नव्हता. अखेर त्यांना लढा यशस्वी झाला आहे.

तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला. दलितांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दलितांनी सांगितले की, देवघरात प्रवेश झाल्याने खूप आनंद झाला आहे.

यावेळी इतर समाजातील लोकांनी दलितांच्या मंदिरात प्रवेशाला विरोध केला नाही. या आंदोलनाची सुरुवात जुलै महिन्यात मंदिर प्रवेशावरून दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणातून झाली होती. या दरम्यान दलित आणि वन्नियार यांच्यात अनेक हाणामाऱ्या झाल्या होत्या. 

दोन तरुणांपैकी एक दलित, तर दुसरा वन्नियार समाजाचा होता. दोघेही एकाच शाळेत शिकले आणि नोकरीसाठी चेन्नईला गेले होते. दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सर्वप्रथम समाजमाध्यमांवर वाद घातला. नंतर गावात दोघांमध्ये भांडण झाले.

हवे ते सर्व मिळते...चेल्लनकुप्पम गावात, बहुतेक नवविवाहित जोडपे मंदिरात प्रार्थना करतात आणि पोंगल शिजवतात. यामुळे त्यांना हवे ते सर्व मिळते, असे मानले जाते. मंदिर प्रवेशामुळे आज आम्ही आनंदी आहोत, असे एका महिलेने सांगितले.

आतापर्यंत काय करत होते? - तरुणांमध्ये झालेल्या भांडणानंतर दलित समाजातील व्यक्तींनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी मंदिरात प्रवेश करू देण्याची विनंती केली. यानंतर, दलितांनी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. - वेल्लोर रेंजचे डीआयजी एम.एस. मुथुसामी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला होता. आतापर्यंत दलित समाज कलियाम्मल मंदिरात पूजा करत होते. हे मंदिर ३० वर्षांपूर्वी दलित समाजाने बांधले आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTempleमंदिर