शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 08:26 IST

अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे

नवी दिल्ली - अफगानिस्तानने आज म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतसरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचे आणि अफगानिस्तानसाठी मदतींची पूर्तता करण्यात सरकारला अपयश येत असल्याने आपण हे दुतावास केंद्र बंद करत आहोत, अशी घोषणाच अफगानिस्तान सरकारने केली आहे. सरकारकडून हवे असलेलं समर्थन मिळत नसल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अफगानिस्तानने म्हटले की, अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. मात्र, अफगानिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील आजपर्यंतचे ऐतिहासिक संबंध आणि दिर्घकाळापासूनची भागिदारी लक्षात घेऊनच हा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला आहे.  

भारतात दुतावासाकडील समर्थनाचा अभाव आणि काबुलमध्ये वैध सरकारच्या अनुपस्थितीमुळे अफगानिस्तान व तेथील नागरिकांच्या सर्वोत्तम हित, सेवा, अपेक्षां आणि गरजांची पूर्तता करण्यात आम्ही कमी पडत आहोत हे स्वीकार करतो. दुतावासासाठी व्हिसा नुतनीकरणापासून ते सहकार्याच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात वेळ आणि अपेक्षित मदतीची पूर्तता न झाल्याने आमच्या टीममध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे, नियमित कर्तव्यांची पूर्तता करण्याची आमची क्षमता कमी झाल्याचेही अफगानिस्तानने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानCentral Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारdelhiदिल्ली