शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 08:26 IST

अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे

नवी दिल्ली - अफगानिस्तानने आज म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतसरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचे आणि अफगानिस्तानसाठी मदतींची पूर्तता करण्यात सरकारला अपयश येत असल्याने आपण हे दुतावास केंद्र बंद करत आहोत, अशी घोषणाच अफगानिस्तान सरकारने केली आहे. सरकारकडून हवे असलेलं समर्थन मिळत नसल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अफगानिस्तानने म्हटले की, अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. मात्र, अफगानिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील आजपर्यंतचे ऐतिहासिक संबंध आणि दिर्घकाळापासूनची भागिदारी लक्षात घेऊनच हा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला आहे.  

भारतात दुतावासाकडील समर्थनाचा अभाव आणि काबुलमध्ये वैध सरकारच्या अनुपस्थितीमुळे अफगानिस्तान व तेथील नागरिकांच्या सर्वोत्तम हित, सेवा, अपेक्षां आणि गरजांची पूर्तता करण्यात आम्ही कमी पडत आहोत हे स्वीकार करतो. दुतावासासाठी व्हिसा नुतनीकरणापासून ते सहकार्याच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात वेळ आणि अपेक्षित मदतीची पूर्तता न झाल्याने आमच्या टीममध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे, नियमित कर्तव्यांची पूर्तता करण्याची आमची क्षमता कमी झाल्याचेही अफगानिस्तानने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानCentral Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारdelhiदिल्ली