शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

Afghanistan Taliban Crisis: “तालिबानींना घाबरण्याची भारताला गरज नाही; त्यांच्यापेक्षा क्रूरता आपल्याकडे आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:22 IST

तालिबानी मुद्द्यावर अलीकडे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी तालिबानींची तुलना भारतातील स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. आता प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांनी भाष्य केले आहे.

ठळक मुद्देजितकी AK 47 तालिबानींकडे आहेत तितकी भारतातील माफियांकडे आहेत. तालिबानी हत्यारं लुटून किंवा मागून घेतात परंतु आपल्या येथील माफीया हत्यारं खरेदी करतातमहात्मा गांधी साधे होते. नथुराम गोडसे तालिबानी होता. उत्तर प्रदेशात तालिबानीसारखं काम होत आहे

लखनौ – अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानी सत्ता आल्यापासून जगभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत तसं भारतातही यावर विविध भाष्य केले जात आहे. सपा खासदार आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं तालिबानचं कौतुक केले आहेत. अशातच प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा(Munawwar Rana) यांनी तालिबान प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केल्यानं अनेकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मुन्नवर राणा म्हणाले की, जितकी क्रूरता अफगाणिस्तानात आहे. त्यापेक्षा जास्त क्रूरता आपल्याकडे आहे. पूर्वी रामराज्य होतं आणि आता कामराज्य आहे. जर रामाकडे काम असेल तर ठीक आहे अन्यथा काहीच नाही. हिंदुस्तानला तालिबानशी घाबरण्याची गरज नाही. कारण अफगाणिस्तानसोबत हजारो वर्षापासून साथ आहे त्यांनी कधी हिंदुस्तानला नुकसान पोहचवलं नाही. जेव्हा मुल्ला उमरची हुकूमत होती तेव्हाही त्यांनी कुठल्याही हिंदुस्तानीला नुकसान नाही केले. कारण त्याचे बापजादे हिंदुस्तानातून कमवून घेऊन गेले आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच जितकी AK 47 तालिबानींकडे आहेत तितकी भारतातील माफियांकडे आहेत. तालिबानी हत्यारं लुटून किंवा मागून घेतात परंतु आपल्या येथील माफीया हत्यारं खरेदी करतात. जोपर्यंत हे सरकार आहे काहीही करु शकतं परंतु वातावरण नेहमी एकसारखं राहत नाही. धर्मांतरणासारख्या मुद्द्यानं देशाला नुकसान होतं. आपला देश पूर्वीसारखा होता तसा व्हावा हीच आमची इच्छा आहे असं मुन्नवर राणा यांनी यूपीतील देवबंद येथे एटीएस सेंटर बनवण्यावर भाष्य केले.

त्याचसोबत उत्तर प्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुस्लीम नाही तर हिंदू तालिबानीही आहेत. दहशतवादी फक्त मुस्लीम असतो का? तो हिंदूही असू शकतो. महात्मा गांधी साधे होते. नथुराम गोडसे तालिबानी होता. उत्तर प्रदेशात तालिबानीसारखं काम होत आहे असंही मुन्नवर राणा यांनी एका चॅनेलला मुलाखत देताना म्हटलं आहे. मुन्नवर राणा यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणावर वादग्रस्त विधानं केली आहेत. तालिबानी मुद्द्यावर अलीकडे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी तालिबानींची तुलना भारतातील स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. शफीकुर्रहमान यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल झाली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान