शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Afghanistan Taliban Crisis: तालिबानशी चांगले संबंध ठेवल्यास भारताचा तिहेरी फायदा; नरेंद्र मोदी घेणार पुढाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 15:33 IST

भारतच तालिबानशी चर्चा करतोय असं नाही तर तालिबानकडूनही काश्मीर आणि अफगाणिस्तानात सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांबाबत विधान आलं आहे.

ठळक मुद्देतालिबानलाही भारतासोबत चांगले संबंध हवेत. कंगाल पाकिस्तानऐवजी विकसित हिंदुस्तानसोबत ठेवण्यासाठी तालिबानचे प्रयत्न आहेत. भारताने नेहमी तालिबानसोबत चांगले संबंध ठेवण्याचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत.तालिबान आता जुन्या दहशतवादी संघटनेच्या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे.

भारतासाठी(India) अफगाणिस्तानी(Afghanistan) आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचं आहे. दक्षिण पूर्व आशिया खंडाचं केंद्र असलेल्या अफगाणिस्तानात जर भारताने ठाम जागा बनवली तर ते फक्त पाकिस्तान (Pakistan) वर दबाव आणण्यास यश मिळणार नाही तर चीनवरही भारताला नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी तालिबान(Taliban) सोबत केवळ चर्चा नाही तर अमेरिकेसारख्या देशांकडून मान्यताही मिळवावी लागेल.

भारतच तालिबानशी चर्चा करतोय असं नाही तर तालिबानकडूनही काश्मीर आणि अफगाणिस्तानात सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांबाबत विधान आलं आहे. तालिबानलाही भारतासोबत चांगले संबंध हवेत. कंगाल पाकिस्तानऐवजी विकसित हिंदुस्तानसोबत ठेवण्यासाठी तालिबानचे प्रयत्न आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. जगानेही कुठेतरी हे मान्य केले आहे. चीन, रशिया, पाकिस्तान, तुर्कीसारख्या देशांनी तालिबानी सत्तेला मान्यता दिली आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबानविरोधात जो कडक पवित्रा घेतला होता तो सध्या घेत नाही. त्यामुळे भारतासाठी ही परिस्थिती खूप महत्त्वाची आहे.

भारताने नेहमी तालिबानसोबत चांगले संबंध ठेवण्याचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. देशात सरकार कुणाचंही असलं तरी तालिबानी दृष्टीकोना एकसमान आहे. परंतु आता तालिबान अफगाणिस्तानात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारला मागच्या दाराने त्याच्याशी चर्चा करावी लागेल. ही चर्चा कितपत यशस्वी ठरेल सांगता येत नाही. परंतु आता आपल्याला विलंब करुन चालणार नाही. तालिबानला मान्यता देऊन जागतिक राजकारणात भारत पुढाकार घेऊ शकतो.

तालिबान आता जुन्या दहशतवादी संघटनेच्या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासोबत अफगाणिस्तानात दुसरा तालिबान उभा राहू नये यासाठी त्याला फंड आणि विकासाची गरज भासणार आहे. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारत तालिबानसाठी योग्य पार्टनर राहणार आहे. तसंही पाकिस्तानशी निगडीत अनेक कटू आठवणी तालिबानकडे आहेत. पख्तुन येथील लोकसंख्या पाकिस्तानसाठी नाखुश करणारी आहे. पाकिस्तान नेहमी अफगाणिस्तानचे तुकडे करण्याचा विचार करतोय हे अफगाणिस्तानला माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील वाढतं अंतर पाहता भारताने पुढाकार घ्यायला हवा असं तज्त्रांना वाटतं. अफगाणिस्तानात येताच तालिबाननं सर्वप्रथम भारताला त्यांचे प्रकल्प पूर्ण करावेत असं आवाहन केले आहे.

भारताने सोबत येऊन अफगाणिस्तानात प्रकल्प राबवावेत अशीच तालिबानची इच्छा आहे. काश्मीर हा द्विपक्षीय आणि भारत-पाक यांच्यातील अंतर्गत मुद्दा आहे आम्ही त्यात पडणार नाही असं तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर आता तिथे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अनेक निधीची त्यांना गरज लागणार आहे. भारत पहिल्यापासून अफगाणिस्तानला सहकार्य करत आला आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानात खर्च करू शकत नाही कारण तो स्वत: कंगाल आहे. मुत्सद्दीपणा पाहता भारताने तालिबानसोबत चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती बदलली आहे. भारताला अफगाणिस्तान हातातून गमवायचं नाही. तालिबान स्वत:मध्ये बदल करु इच्छित आहे. त्यामुळे भारताने तालिबानशी संबंध चांगले ठेवल्यास ३ गोष्टीत फायदा होईल. अफगाणिस्तानात भारताने २२ हजार कोटी गुंतवणूक केली आहे ती डुबणार नाही. तालिबान मजबूत झाल्यानं काश्मीरमध्ये जी उत्पत्ती होऊ शकते ती होणार नाही आणि तिसरं महत्त्वाचं पाकिस्तान अफगाणिस्तानातील जमीन आणि तालिबानींना भारताविरोधात वापरु शकणार नाहीत.

 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान