शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Afghanistan Taliban Crisis : भीषण! 14 व्या वर्षी तालिबानी मुलाशी लग्न, 26 वर्षे छळ, असंख्य जखमा; एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 10:24 IST

Afghanistan Taliban Crisis : तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तालिबान कशाप्रकारेअफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या भोगल भागात फरीबा नावाची एक अफगाणी महिला एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहते. आपल्या देशापासून दूर राहूनही ती सध्या आनंदी आहे. कारण तिला भारतात आदर आणि शांततेचे जीवन जगता येत आहे. पण फरीबाची आधीची कहाणी ऐकल्यावर तालिबानींचा क्रूर चेहरा समोर येईल. फरीबाचं लग्न एका तालिबानी मुलाशी झालं होतं. 

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी कुटुंबाने तिचे लग्न केलं होतं. नंतर जेव्हा तिला दोन मुली झाल्या तेव्हा फरीबाच्या नवऱ्याने आपल्या दोन्ही मुले विकल्या. त्याने 26 वर्षे फरीबाचा छळ केला. पण आता ती तिचे आयुष्य पुन्हा शांततेत आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानी पतीने तिला कसा त्रास दिला याचा पुरावा तिच्या शरीरावर असलेल्या असंख्य जखमांवरून दिसून येतो. आता भारतात उपचार घेतल्यानंतर फरीबाची प्रकृती चांगली आहे. तिच्या खोलीच्या एका छोट्या कोपऱ्यात, एक जुनं पुस्तक आहे. त्या पानांदरम्यान एक फोटो लपवून ठेवला आहे. 

फरीबाची दोन बोटं या फोटोत कापलेली पाहायला मिळत आहेत. तालिबानने केलेल्या अत्याचाराची आठवण करून देण्यासाठी फरीबाने हा फोटो ठेवला आहे. तिच्या शरीरावर अशा अनेक जखमा आहेत. फरीबा आता दिल्लीच्या लाजपत नगर भागात जिम ट्रेनर म्हणून काम करत आहे. फरिबाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यामुळे तिचे लग्न वयाच्या 14 व्या वर्षी झाले होते. अफगाणिस्तानात महिलांना कोणाशी लग्न करायचे हे स्वातंत्र्य नाही. फरीबा सांगते की, लग्नानंतर काही वर्षांनी तिने दोन मुलींना जन्म दिला. मात्र काही दिवसातच तिच्या पतीने आपल्या मुलांना विकलं.

फरीबाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पती आणि सासरच्यांना खूप विनवणी केली पण सर्व काही व्यर्थ ठरले. तिचा नवरा किंवा तिच्या सासरच्यांनीही हे मान्य केले नाही. फरीबा स्वतःच्या मुलीच्या विक्रीनंतर खूपच खचून गेली होती. मात्र आता भारतात आश्रय मिळाल्याने फरीबाला खूप आनंद झाला आहे. भारतात बसून ती अफगाणिस्तान वेगाने होत असलेल्या गोष्टी पाहत आहे. "जगात भारतासारखा देश असूच शकत नाही. सर्व धर्म, जाती आणि राष्ट्रांचे लोक येथे शांततेने राहतात. जर मी इथे आले नसते तर असंही जीवन जगणं शक्य आहे हे मला कधीच कळलं नसतं" असं देखील तिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत