शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: तालिबानबाबत भारताचे आस्ते कदम, मान्यता देण्याबाबत घेतली अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:33 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे.

नवी दिल्ली - गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेले अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा अगदी सहजपणे अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Afghanistan Crisis) दरम्यान, अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. एकीकडे रशिया, चीन या देशांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तर युरोपियन महासंघ आणि अमेरिका तालिबानबाबत प्रतिकूल आहेत. दरम्यान, आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे. (India will clarify its position on the Taliban once the government is formed in Afghanistan)

दरम्यान, आज झालेल्या बैठकीमध्ये तालिबानला मान्यता देण्याबाबत कुठलाही निर्णय भारत सरकारकडून घेण्यात आलेला नाही. तर अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानला मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेईल हे पाहावे लागेल.

तालिबाबने अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करून इस्लामिक राज्य स्थापन करण्याची तयारी केली असली तरी आंतरराष्ट्रीय समुदायाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. तसेच अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवरही तालिबानने अगदी सहजपणे कब्जा केला होता. मात्र तालिबानला पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची मदत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच चीनकडूनही तालिबान्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालिबानी दहशतवादी भारतासाठी काश्मीरमध्ये डोकेदुखी ठरू, शकतात. त्या कारणाने भारताला तालिबानबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान