शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रेनचं माहिती नाही पण रेल्वेमत्र्यांकडे नक्कीच कवच आहे"; झारखंड रेल्वे अपघातावरुन आदित्य ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:48 IST

Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये भीषण अपघात रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या असून या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

Aditya Thackeray on Train Accident : झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे सर्व डबे रुळावरून घसरले. या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. विरोधकांकडून झारखंडमधील घटनेवरूनही रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली आहे.

पहाटे पावणेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रेन क्रमांक १२८१० हावडा सीएसएमटी एक्सप्रेस ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. हा अपघात इतका भीषण होता की दोन प्रवाशांचे मृतदेह ट्रेनच्या बाथरूममध्ये अडकले. रेल्वेचा डबा कापून मृतदेह बाथरूममधून बाहेर काढण्यात आला. या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला.

"मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वेमंत्र्यांकडे नक्कीच काही तरी कवच आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना पदावरुन हटवले गेले नाही. दर आठवड्याला काही ना काही अपघात घडतात, मात्र कारवाई होत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपचे 'राजकीय प्रभारी' मंत्री करण्यात आले आहेत. त्यांनी मंत्रालयावर लक्ष केंद्रित करायला नको का?," असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही बोगी रुळावरून घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या शेजारी उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. हा अपघात झाला तेव्हा ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने जात होती. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे