शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: “प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही”: अदिती सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 17:40 IST

प्रियंका गांधी यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अदिती सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच काँग्रेसच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या पक्षांतरावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली होती. यावर, प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, शेतकऱ्यांशी त्यांना काही देणे-घेणे नाही, असा पलटवार अदिती सिंह यांनी केला आहे. 

जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत, असे प्रियंका गांधी म्हणतात. मात्र, यातून त्या संपूर्ण भारत भ्याड असल्याचे बोलत आहेत, असा टोलाही अदिती सिंह यांनी लगावला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना अदिती सिंह यांनी काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. 

मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहणार

माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहीन, असे अदिती सिंह यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी प्रियंका गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, याचा अर्थ त्या संपूर्ण भारत भ्याड लोकांचा देश आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियंका गांधी यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अदिती सिंह यांनी सांगितले. तसेच काँग्रेस पक्ष सोडणारी मी पहिली महिला नाही. आता काँग्रेसमध्ये उरलेच कोण आहे? काँग्रेसच्या धोरणांमध्येच खूप कमतरता आहेत. त्यामुळेच लोक पक्ष सोडून जात आहेत, अशी टीकाही अदिती सिंह यांनी केली. 

मी प्रामाणिकपणे काम करेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे खूप प्रभावित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करेन. माझा विचार सदर मतदारसंघातूनच निवडणूक लढण्याचा आहे. मात्र, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार मी काम करेन, असेही अदिती सिंह म्हणाल्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस