शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

UP Election 2022: “प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही”: अदिती सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 17:40 IST

प्रियंका गांधी यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अदिती सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच काँग्रेसच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या पक्षांतरावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली होती. यावर, प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, शेतकऱ्यांशी त्यांना काही देणे-घेणे नाही, असा पलटवार अदिती सिंह यांनी केला आहे. 

जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत, असे प्रियंका गांधी म्हणतात. मात्र, यातून त्या संपूर्ण भारत भ्याड असल्याचे बोलत आहेत, असा टोलाही अदिती सिंह यांनी लगावला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना अदिती सिंह यांनी काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. 

मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहणार

माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहीन, असे अदिती सिंह यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी प्रियंका गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, याचा अर्थ त्या संपूर्ण भारत भ्याड लोकांचा देश आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियंका गांधी यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अदिती सिंह यांनी सांगितले. तसेच काँग्रेस पक्ष सोडणारी मी पहिली महिला नाही. आता काँग्रेसमध्ये उरलेच कोण आहे? काँग्रेसच्या धोरणांमध्येच खूप कमतरता आहेत. त्यामुळेच लोक पक्ष सोडून जात आहेत, अशी टीकाही अदिती सिंह यांनी केली. 

मी प्रामाणिकपणे काम करेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे खूप प्रभावित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करेन. माझा विचार सदर मतदारसंघातूनच निवडणूक लढण्याचा आहे. मात्र, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार मी काम करेन, असेही अदिती सिंह म्हणाल्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस