शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 19:31 IST

Bihar Reservation High Court News: हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नितीशकुमार सुप्रिम कोर्टात जाणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के केली होती.

काही महिन्यांपूर्वी बिहार सरकारने जातीय जनगणना करून त्यावरून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के केली होती. या आरक्षणाला पटना हायकोर्टाने सुरुंग लावला असून ते रद्द केले आहे. केंद्रात सत्तेत गेलेल्या नितीशकुमार यांना मोठा झटका बसला आहे. याविरोधात बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असले तरी इकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत धाकधुक वाढली आहे. 

बिहार सरकारने १५ टक्क्यांनी वाढविलेल्या आरक्षणाला पाटना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज हा महत्वाचा निर्णय दिला आहे. एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये नितीशकुमार सरकारने आरक्षण दिले होते. 

या सुनावणीवेळी इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख करण्यात आला होता. याच खटल्यावरून महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची घोषणा केली होती. ११ मार्चला बिहारमध्ये आरक्षणावरील सुनावणी संपली होती. हा निकाल लोकसभा निवडणुकीमुळे राखून ठेवण्यात आला होता.  

बिहारमध्ये सध्या OBC ला 27%, SC ला 15% आणि ST ला 7.5% आरक्षण मिळाले आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांनाही १० टक्के आरक्षण मिळाले आहे.

कशाच्या आधारावर आरक्षण फेटाळले...एससी-एसटी, ओबीसी आणि ईबीसीसाठी जे आरक्षण वाढवण्यात आले होते ते घटनेच्या कलम 14, 15 आणि 16 च्या विरोधात होते. इंदिरा साहनी प्रकरणात एससी, एसटी आणि ओबीसी या तीन प्रवर्गासाठी कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही, असा निर्णय देण्यात आला होता. कोर्टाने यावरच बोट ठेवत बिहार सरकारने दिलेले आरक्षण कायदा रद्द केला आहे. 

टॅग्स :Biharबिहारreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय