शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तबलिगी जमातच्या 'त्या' सदस्यांना परेश रावल यांचा एकच टोकदार सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:49 IST

लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.'

ठळक मुद्देपरेश रावल म्हणाले लॉकडाऊन काळाची गरज आणि सर्वांच्याच हिताचेलोकांना परिस्थितीचे गांभीर्य नसेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल - परेश रावलपरेश रावल म्हणतात ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे, त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा

नवी दिल्ली- देशात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर आज अभिनेते आणि नेते परेश रावल यांनीही भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे केलेल्या विनंतीचे समर्थन केले. तसेच तबलिगी जमातसंदर्भातही आपले मत व्यक्त केले आहे.

लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हेल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.' यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघण करणाऱ्यांसोबत पोलीस कठोरपणे वागत असल्याच्या तक्रारींसदर्भात ते म्हणाले, 'पोलिसांनाही हे बरे वाटत नाही. मात्र, लोक परिस्थितीचे गांभीर्यच ओळखायला तयार नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.'

संपूर्ण देशाने पाहिले आहे, की दिल्लीतील निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या किती वेगाने वाढली आहे. तेथून बाहेर पडणारे जास्तीत जास्त जमाती कोरोना पाझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर जेव्हा त्यांना वेगवेगळ्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले, तेव्हा तेथील त्यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे, की जमातचे नाव घेऊन लोक या विषयाला धार्मिक विषय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परेश रावल यांनी एका झटक्यात या सर्व चर्चांना बाजूला सारत, 'ही केवळ कुण्या एकाधर्माची गोष्ट नाही, मिनिटा-मिनिटाला बातम्या आल्या आहेत आणि यासंदर्भात लोकांना सर्व माहित आहे. थुंकणे आणि उघड्यावर विष्ठाकरणे या गोष्टी सर्वांनाच माहीत आहे. कुणीही याचा इनकार करू शकत नाही.

परेश रावल यांनी त्यांचे म्हणणे एका सोप्या प्रश्नाने संपवले. त्यांनी विचारले, की 'मला वाटते, ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे. त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा. आपल्या देशात आत्महत्यादेखील गुन्हा आहे. त्यामुळे, जर आपण दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकत असून तर त्यावर प्रश्न विचारायला नको?'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParesh Rawalपरेश रावलbollywoodबॉलिवूडMuslimमुस्लीमIndiaभारतdelhiदिल्ली