शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

CoronaVirus: तबलिगी जमातच्या 'त्या' सदस्यांना परेश रावल यांचा एकच टोकदार सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:49 IST

लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.'

ठळक मुद्देपरेश रावल म्हणाले लॉकडाऊन काळाची गरज आणि सर्वांच्याच हिताचेलोकांना परिस्थितीचे गांभीर्य नसेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल - परेश रावलपरेश रावल म्हणतात ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे, त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा

नवी दिल्ली- देशात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर आज अभिनेते आणि नेते परेश रावल यांनीही भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे केलेल्या विनंतीचे समर्थन केले. तसेच तबलिगी जमातसंदर्भातही आपले मत व्यक्त केले आहे.

लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हेल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.' यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघण करणाऱ्यांसोबत पोलीस कठोरपणे वागत असल्याच्या तक्रारींसदर्भात ते म्हणाले, 'पोलिसांनाही हे बरे वाटत नाही. मात्र, लोक परिस्थितीचे गांभीर्यच ओळखायला तयार नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.'

संपूर्ण देशाने पाहिले आहे, की दिल्लीतील निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या किती वेगाने वाढली आहे. तेथून बाहेर पडणारे जास्तीत जास्त जमाती कोरोना पाझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर जेव्हा त्यांना वेगवेगळ्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले, तेव्हा तेथील त्यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे, की जमातचे नाव घेऊन लोक या विषयाला धार्मिक विषय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परेश रावल यांनी एका झटक्यात या सर्व चर्चांना बाजूला सारत, 'ही केवळ कुण्या एकाधर्माची गोष्ट नाही, मिनिटा-मिनिटाला बातम्या आल्या आहेत आणि यासंदर्भात लोकांना सर्व माहित आहे. थुंकणे आणि उघड्यावर विष्ठाकरणे या गोष्टी सर्वांनाच माहीत आहे. कुणीही याचा इनकार करू शकत नाही.

परेश रावल यांनी त्यांचे म्हणणे एका सोप्या प्रश्नाने संपवले. त्यांनी विचारले, की 'मला वाटते, ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे. त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा. आपल्या देशात आत्महत्यादेखील गुन्हा आहे. त्यामुळे, जर आपण दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकत असून तर त्यावर प्रश्न विचारायला नको?'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParesh Rawalपरेश रावलbollywoodबॉलिवूडMuslimमुस्लीमIndiaभारतdelhiदिल्ली