शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus: तबलिगी जमातच्या 'त्या' सदस्यांना परेश रावल यांचा एकच टोकदार सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:49 IST

लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.'

ठळक मुद्देपरेश रावल म्हणाले लॉकडाऊन काळाची गरज आणि सर्वांच्याच हिताचेलोकांना परिस्थितीचे गांभीर्य नसेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल - परेश रावलपरेश रावल म्हणतात ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे, त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा

नवी दिल्ली- देशात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर आज अभिनेते आणि नेते परेश रावल यांनीही भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे केलेल्या विनंतीचे समर्थन केले. तसेच तबलिगी जमातसंदर्भातही आपले मत व्यक्त केले आहे.

लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हेल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.' यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघण करणाऱ्यांसोबत पोलीस कठोरपणे वागत असल्याच्या तक्रारींसदर्भात ते म्हणाले, 'पोलिसांनाही हे बरे वाटत नाही. मात्र, लोक परिस्थितीचे गांभीर्यच ओळखायला तयार नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.'

संपूर्ण देशाने पाहिले आहे, की दिल्लीतील निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या किती वेगाने वाढली आहे. तेथून बाहेर पडणारे जास्तीत जास्त जमाती कोरोना पाझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर जेव्हा त्यांना वेगवेगळ्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले, तेव्हा तेथील त्यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे, की जमातचे नाव घेऊन लोक या विषयाला धार्मिक विषय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परेश रावल यांनी एका झटक्यात या सर्व चर्चांना बाजूला सारत, 'ही केवळ कुण्या एकाधर्माची गोष्ट नाही, मिनिटा-मिनिटाला बातम्या आल्या आहेत आणि यासंदर्भात लोकांना सर्व माहित आहे. थुंकणे आणि उघड्यावर विष्ठाकरणे या गोष्टी सर्वांनाच माहीत आहे. कुणीही याचा इनकार करू शकत नाही.

परेश रावल यांनी त्यांचे म्हणणे एका सोप्या प्रश्नाने संपवले. त्यांनी विचारले, की 'मला वाटते, ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे. त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा. आपल्या देशात आत्महत्यादेखील गुन्हा आहे. त्यामुळे, जर आपण दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकत असून तर त्यावर प्रश्न विचारायला नको?'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParesh Rawalपरेश रावलbollywoodबॉलिवूडMuslimमुस्लीमIndiaभारतdelhiदिल्ली