शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

Bhima Koregaon: गौतम नवलखा यांची नजरकैदेतूनही सुटका, पुणे पोलिसांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 6:26 PM

भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला.

नवी दिल्ली: भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला.२८ आॅगस्ट रोजी दिल्लीत अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी पुण्याला नेण्यासाठी राजधानीतील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडून त्यांचा ‘ट्रान्सिट रिमांड’ घेतला होता. लगेचच नवलखा यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने या रिमांडला अंतरिम स्थगिती देऊन नवलखा यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. पुढे नवलखा यांच्या पाच मित्रांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळेपर्यंत नवलखा महिनाभर नजरकैदेतच होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालायच्या न्या. एस. मुरलीधर व न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर नवलखा यांची याचिका मंजूर करताना ‘ट्रान्सिट रिमांड’च रद्द केल्याने नजरकैदही संपुष्टात आली.

‘ट्रान्सिट रिमांड’ रद्द केला असला तरी त्याने कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यास पोलिसांना बाध येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी नवलखा यांना अटक केली. परंतु त्यांनी कोठडीत ठेवण्याची कोणताही वैध रिमांड आदेश नसल्याने पोलिसांना तपासासाठी नवलखा यांचा ताबा मिळणार नाही. त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा अटक करण्याचीही कायद्यात सोय नाही.वैध रिमांड आदेश नसताना नवलखा २४ तासांहून अधिक काळ स्थानबद्धतेत राहिले.त्याने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ५६ व ५७ चा उघडपणे भंग झाल्याने नवलखा यांना आणखी पुढे नजरकैदेतही ठेवले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.आरोपींच्या मित्रांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची नजरकैद आणखी चार आठवडे सुरु राहील, असे निदर्शनास आणत महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवलखा यांची नजरकैद आणखी निदान दोन दिवस तरी सुरु ठेववी, अशी विनंती केली. मात्र ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, आरोपींना खालच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी ही मुदत दिली गेली होती. पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वीच नवलखा यांनी आमच्याकडे ही याचिका केलेली असल्याने त्यांना ती लागू होत नाही.

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे करून भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी देण्याच्या आरोपांवरून विविध ठिकाणी धाडी टाकून पुणे पोलिसांनी नवलखा यांच्याखेरीज वरावरा राव (हैदराबाद), सुधा भारद्वाज (फरिदाबाद), अरुण फरेरा (ठाणे) व व्हर्नॉन गोन्साल्विस (मुंबई) यांना अटक केली होती. हे आरोपी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचेही सक्रिय कार्यकर्ते असल्याचे तपासातून उघड झाल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने हे पाचही आरोपी आत्तापर्यंत नजरकैदेतच राहिल्याने त्यांच्यापैकी एकाचाही ताबा पोलिसांना मिळालेला नाही.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारHigh Courtउच्च न्यायालय