शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हांवर कारवाई, वेगळे होण्याची शॉटगनचीही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:13 IST

चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा पक्षावर टीका केल्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज असून, गुजरात व हिमाचलच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होेणार असल्याचे समजते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा पक्षावर टीका केल्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज असून, गुजरात व हिमाचलच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होेणार असल्याचे समजते.शत्रुघ्न सिन्हा नेहमीच भाजपावर टीका करत असतात. आता त्यांचा आवाज आणखी तीव्र झाल्याने या ‘आवाजावर’ कारवाई करणे भाजपाला भाग पडत आहे.केंद्र सरकारमधील मंंत्री निवडणुका व निवडणूक आयोगाची देखभाल करण्यासाठी गुजरातमध्ये बसले आहेत काय? दिल्लीला घर वापसी कधी आहे? देशाचीही काळजी घ्या, घरवापसी लवकर होईल, अशी अपेक्षा आहे, असे ते अलीकडेच म्हणाले. संसदेचे अधिवेशन उशिराने १५ डिसेंबरपासून सुरू होत असल्याबद्दलही सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली होती.पूर्ण केंद्र सरकार विजयासाठी गुजरातमध्ये बसले आहे. ईव्हीएममध्ये काही बिघाड तर नाही ना, अशी त्यामुळे काळजी घ्यायला हवी. याच मुद्द्यावरून आपल्याला दोष दिला जात आहे, पक्षाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविले जात आहे, असेही ते म्हणाले. गुजरातमध्ये भाजपा ‘वीक विकेट’वर असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जिग्नेश, अल्पेश आणि हार्दिक यांना काँग्रेसचे एजंट असल्याचे आपले लोक सांगत फिरत आहेत. ही ‘आंबट द्राक्षां’ची परिपूर्ती तर नाही ना?, असेही त्यांनी म्हटले आहे. अच्छे दिनविषयी बोलण्याची हीच वेळ योग्य आहे, असे आपणास वाटत नाही का, असा सावल करून सिन्हा यांनी २0१२ निवडणुकीत गुजरातमध्ये ५० लाख घरे उभारण्याची घोषणा केली होती, याचीही आठवण करून दिली आहे. यापूर्वीही सिन्हा यांनी पक्षाच्या निर्णयांच्या विरोधात उघडउघड टीका केली होती. पक्षनिर्णयाविरोधात आवाज उठवणारे यशवंत सिन्हा यांनाही पाठिंबा दिला होता.मानसिक तयारी आहेच!अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपापासून वेगळे होण्याची मानसिक तयारी केल्याचे समजते. पक्ष आपल्याला कधी काढून टाकेल किंवा निलंबित करेल, याची ते वाट पाहत आहेत. कीर्ती आझाद यांनाही भाजपाने यापूर्वी निलंबित केले आहे.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपा