शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

भाजपाची बी टीम असल्याचा आरोप, काँग्रेसने या मित्रपक्षाला यूपीएमधून हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:28 IST

Congress News: काँग्रेस पक्षाने आसाममधील आपला सहकारी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) या पक्षाला यूपीएमधून हाकलले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आसाममधील आपला सहकारी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) या पक्षाला यूपीएमधून हाकलले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याची घोषणा केली आहे. त्यांनी आसाममधील एआययूडीएफ हा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला. एआययूडीएफचे अध्यक्ष बदरुद्दीज अजमल यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत साटेलोटे केले होते, असा दावा जयराम रमेश यांनी केला. काँग्रेसने बदरुद्दीन अजमल यांच्या कथित विधानावरून त्यांच्यावर जोरदार पटलवार केला. तसेच त्यांचा पक्ष हा असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम प्रमाणेच भाजपाचं मुखपत्र आहे, असा टोला लगावला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, अजमल कुठलाही दावा करो. मात्र आता त्यांचं संयुक्त पुरोगामी आघाडीशी(यूपीए) काहीही देणंघेणं नाही आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार अजमल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. आसाममधील काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांच्याकडून रात्रीच्या वेळी पाकीट घेतात, असा आरोप अजमल यांनी केला होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाममध्ये काँग्रेस नेतृत्वाविरोधात संपूर्णपणे अस्वीकारार्ह आणि संतापजनक विधान केले आहे. हे विधान अत्यंत अपमानास्पद आहे.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ हे पक्ष एकत्र आघाडी करून लढले होते. ही आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेससाठी सोपा नव्हता. मात्र अजमल हे विश्वासपात्र सहकारी ठरतील आणि देशात धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकट करतील, असे काँग्रेसला वाटले होते.

अजमल यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने काम केले होते आणि काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याच्या हेतूने ही आघाडी केली होती, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.   

टॅग्स :congressकाँग्रेसAll India United Democratic Frontआॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटAssamआसाम