शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींचे घणाघाती आरोप; अमित शाह यांनी जाहीर केली निधीची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 22:22 IST

राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah On Rahul Gandhi ( Marathi News ) : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचे तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. या खंडणी रॅकेटच्या माध्यमातून भाजप पैसे गोळा करत असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या आरोपांना आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती. आता राजकारणात पुन्हा काळा पैसा येण्याचा धोका आहे, असंही अमित शाह म्हणाले.

राहुल गांधींवर पलटवार करताना अमित शाह यांनी म्हटलं आहे की, "कॅशच्या माध्यमातून जो निधी राजकीय पक्षांना मिळत होता, त्यामध्ये आजपर्यंत कोणाचं नाव जाहीर झालंय का? कोणाचंच नाही झालं. मात्र जे राजकीय आरोप आहेत, त्यांना मला सविस्तर उत्तर द्यायचं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला खूप मोठा फायदा झाला आहे, कारण भाजप सत्तेत आहे, असा अजेंडा चालवला जात आहे. निवडणूक रोखे हे जगातील सगळ्यातं मोठं खंडणी रॅकेट असल्याचं वक्तव्य आज राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यांना कोण असं लिहून देतं, माहीत नाही. मी देशाच्या जनेतसमोर आज चित्र स्पष्ट करू इच्छितो. भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या एकूण निधीचा आकडा २० हजार कोटी रुपये इतका आहे. मग उरलेले १४ हजार कोटी रुपये कुठे गेले? तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी रुपये मिळाले, काँग्रेसला १४०० कोटी रुपये मिळाले आहेत," असा दावा अमित शाह यांनी केला आहे. ते  इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

काय आहे राहुल गांधींचा आरोप?

भाजपवर घणाघाती आरोप करताना आज भिवंडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, "मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट. ईडी-सीबीआय तपास करत नाहीत, ते भाजपसाठी वसुली करतात. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे," असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, "सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सार्वजनिक करावा. त्यानंतर देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचारात ढकलण्यासारखे आहे. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी नाही, तर पंतप्रधान मोदींनी केलं आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग