शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींचे घणाघाती आरोप; अमित शाह यांनी जाहीर केली निधीची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 22:22 IST

राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah On Rahul Gandhi ( Marathi News ) : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचे तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. या खंडणी रॅकेटच्या माध्यमातून भाजप पैसे गोळा करत असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या आरोपांना आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती. आता राजकारणात पुन्हा काळा पैसा येण्याचा धोका आहे, असंही अमित शाह म्हणाले.

राहुल गांधींवर पलटवार करताना अमित शाह यांनी म्हटलं आहे की, "कॅशच्या माध्यमातून जो निधी राजकीय पक्षांना मिळत होता, त्यामध्ये आजपर्यंत कोणाचं नाव जाहीर झालंय का? कोणाचंच नाही झालं. मात्र जे राजकीय आरोप आहेत, त्यांना मला सविस्तर उत्तर द्यायचं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला खूप मोठा फायदा झाला आहे, कारण भाजप सत्तेत आहे, असा अजेंडा चालवला जात आहे. निवडणूक रोखे हे जगातील सगळ्यातं मोठं खंडणी रॅकेट असल्याचं वक्तव्य आज राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यांना कोण असं लिहून देतं, माहीत नाही. मी देशाच्या जनेतसमोर आज चित्र स्पष्ट करू इच्छितो. भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या एकूण निधीचा आकडा २० हजार कोटी रुपये इतका आहे. मग उरलेले १४ हजार कोटी रुपये कुठे गेले? तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी रुपये मिळाले, काँग्रेसला १४०० कोटी रुपये मिळाले आहेत," असा दावा अमित शाह यांनी केला आहे. ते  इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

काय आहे राहुल गांधींचा आरोप?

भाजपवर घणाघाती आरोप करताना आज भिवंडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, "मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट. ईडी-सीबीआय तपास करत नाहीत, ते भाजपसाठी वसुली करतात. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे," असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, "सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सार्वजनिक करावा. त्यानंतर देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचारात ढकलण्यासारखे आहे. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी नाही, तर पंतप्रधान मोदींनी केलं आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग