शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

आंदोलनावेळच्या आराखड्यानुसारच राम मंदिराची उभारणी व्हावी - परांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 03:16 IST

विश्व हिंदू परिषदेचा आग्रह; सरकारने तयार केलेला मंदिर आराखडा अमान्य

मुंबई : न्यायालयाच्या निर्णयाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी मंदिराच्या आराखड्यावरून सरकार आणि विश्व हिंदू परिषद आमनेसामने आल्याचे चित्र आहे. राम मंदिराचे आंदोलन शिगेला पोहोचले तेव्हापासूनच मंदिराचे जे संकल्पचित्र, आराखडा देशवासीयांपर्यंत पोहोचला त्यानुसारच मंदिर उभारले जावे, अशी आग्रही भूमिका मांडतानाच सरकारी मंदिर बनता कामा नये, असा स्पष्ट इशारा विहिंपचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी रविवारी दिला.अयोध्या आणि शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अशोक सिंघल रुग्णसेवा प्रकल्पात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे म्हणाले की, राम मंदिर आंदोलनादरम्यान मंदिराचे एक संकल्पचित्र देशवासीयांपर्यंत पोहोचले होते. त्याच आराखड्यानुसार मंदिराची उभारणी व्हायला हवी. मागील २४ वर्षांत या आराखड्यानुसार मंदिरासाठी लागणारे ६० टक्के शिल्पस्तंभ कोरून तयार आहेत. त्यांचा वापर व्हायला हवा. मंदिरासाठी सहा कोटींहून अधिक लोकांनी संसाधने पुरवली आहेत. अयोध्येतील राम मंदिर हे सरकारी मंदिर बनता कामा नये. समाजाच्या पैशातून मंदिराची उभारणी व्हायला हवी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका हा काही चांगला विचार नाही. बाबर हा परदेशी आक्रमक होता आणि राम भारतीय स्वाभिमानाचा, आस्थेचा विषय आहे. ही बाब मुस्लीम समुदायाने समजून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.विहिंप अथवा रामजन्मभूमी न्यासाने मंदिर उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची निधी संकलानाची मोहीम हाती घेतली नसल्याचेही मिलिंद परांडे यांनी या वेळी स्पष्ट केले. ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभारण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. या ट्रस्टमध्ये विहिंप सहभागी होणार का, या प्रश्नावर ट्रस्टमध्ये सहभागी होण्यात आम्हाला रस नाही. भव्य राम मंदिर उभारले जावे, इतकीच आमची भूमिका आहे. न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून संयमित निर्णय दिला आहे. सर्व पक्षांना न्याय देणारा हा निकाल आहे. त्यामुळे सर्व घटकांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारायला हवा, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. न्यायालयाने देऊ केलेली पाच एकर जागा न स्वीकारण्याची भूमिका मुस्लीम पक्षकारांनी घेतली आहे. यावर, जागा स्वीकारावी की नाही, हा त्यांचा विशेषाधिकार असल्याचे परांडे म्हणाले. न्यायालयाचा निकाल आला असला तरी मशीद पाडली गेली होती, असे सांगत मशीद द्या, अशी भूमिका काही मुस्लीम नेत्यांनी घेतली आहे. याबाबत विचारले असता रामजन्मभूमी स्थानावर बाराव्या शतकातील वैष्णव शैलीतील मंदिर होते हा पुरातत्त्व खात्याचा अहवाल न्यायालयातही मान्य झाला आहे, याची आठवण परांडे यांनी करून दिली....त्याचा विचार शिवसेनेने करावाकाँग्रेसशी हातमिळवणी केल्याने शिवसेना हिंदुत्वापासून लांब गेली असे वाटते का, अशी विचारणा केली असता त्याचा विचार शिवसेनेने करायला हवा. केंद्र आणि राज्यात हिंदू हिताचे सरकार असायला हवे, त्यासाठी हिंदुत्ववादी शक्तींनी एकत्र राहावे, विभागणी-फाटाफूट टाळावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र, त्यासाठी राजकीय घडामोडीत सामील होण्यात आम्हाला रस नसल्याचे मिलिंद परांडे यांनी स्पष्ट केले.राम मंदिराची उभारणी, गोरक्षण, धर्मांतरबंदी आणि देशभरातील एक लाखाहून अधिक सेवा प्रकल्पांत विहिंप व्यस्त आहे. त्यामुळे अन्य कोणते आंदोलन हाती घेण्याचा आमचा विचार नसल्याचे मिलिंद परांडे यांनी काशी आणि मथुरेबाबत विचारले असतास्पष्ट केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या