शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Accident: छत्तीसगडमध्ये लग्नाला जात असताना भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:21 IST

Accident: छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बालोद जिल्ह्यातील जगतारा जवळ झाला.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बालोद जिल्ह्यातील जगतारा जवळ झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील सदस्य होते, असे सांगण्यात येत आहेत. बालोद पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, बालोद जिल्ह्यातील जगतराजवळ ट्रक आणि कार यांच्यात टक्कर होऊन १० जणांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. या जखमी मुलाला अधिक उपचारांसाठी रायपूर येथे पाठवण्यात आलं आहे. तर ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये स्वार झालेलं कुटुंब बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे-३० वरून बालोद येथील जगतरा येथे पोहोचले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या बोलेरोला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात ५ महिला, एक मुलगी आणि ४ पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जखमी मुलीला अधिक उपचारांसाठी रायपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. तसेच पोलिसांनी या अपघातासंदर्भात एफआयआरसुद्धा नोंदवली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की,  बालोदमधील पुरुर आणि चारमादरम्यान, बालोदगहनजवळ लग्नाच्या कार्यक्रमात जात असलेली बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक होऊन, १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो. तसेच कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. मी जखमी मुलीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. 

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नFamilyपरिवार