शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Accident: छत्तीसगडमध्ये लग्नाला जात असताना भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:21 IST

Accident: छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बालोद जिल्ह्यातील जगतारा जवळ झाला.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बालोद जिल्ह्यातील जगतारा जवळ झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील सदस्य होते, असे सांगण्यात येत आहेत. बालोद पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, बालोद जिल्ह्यातील जगतराजवळ ट्रक आणि कार यांच्यात टक्कर होऊन १० जणांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. या जखमी मुलाला अधिक उपचारांसाठी रायपूर येथे पाठवण्यात आलं आहे. तर ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये स्वार झालेलं कुटुंब बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे-३० वरून बालोद येथील जगतरा येथे पोहोचले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या बोलेरोला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात ५ महिला, एक मुलगी आणि ४ पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जखमी मुलीला अधिक उपचारांसाठी रायपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. तसेच पोलिसांनी या अपघातासंदर्भात एफआयआरसुद्धा नोंदवली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की,  बालोदमधील पुरुर आणि चारमादरम्यान, बालोदगहनजवळ लग्नाच्या कार्यक्रमात जात असलेली बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक होऊन, १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो. तसेच कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. मी जखमी मुलीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. 

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नFamilyपरिवार