शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जी २० परिषदेसाठी तैनात जवानांच्या रेल्वे कोचमधील एसी बंद, रेल्वे स्टेशन गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 15:10 IST

कोलकाता जाणाऱ्या ट्रेनमधील जवानांच्या कोचमध्ये एसी बंद पडला होता.

कोलकाता - राजधानी दिल्लीत जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जगभरातील विविध देशांच्या प्रमुखांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांसह सैन्य दलाच्या जवानांनाही दिल्लीला आणण्यात आले होते. त्यासाठी, कोलकातावरुनही सैन्य जवानांचे पथक आले होते. मात्र, दिल्लीहून कोलकाताकडे परत जाताना ह्या जवानांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जवानांच्या कोचमधील एसी खराब झाल्यामुळे मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर उतरुन तीव्र संताप व्यक्त केला. 

कोलकाता जाणाऱ्या ट्रेनमधील जवानांच्या कोचमध्ये एसी बंद पडला होता. त्यामुळे, या कोचमधून प्रवास करणाऱ्या सीआयएसफच्या सैनिकांना त्रास सहन करावा लागला. कोलकाताला जाणारी ही ट्रेन मुरादाबाद स्टेशनवर थांबली असता, जवानांनी खाली उतरुन गोंधळ सुरू केला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मुरादाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबली होती. त्यावेळी, कोचमधून ५० पेक्षा अधिक जवान खाली उतरले, जोरजोराने ते बोलतानाचे पाहून स्टेशनवर गर्दी जमा झाली होती. 

जवानांच्या कोचमधील एसी बंद असल्याने २० जवानांची प्रकृती बिघडली होती. जवानांसाठीचा एसी-३ कोच हा दिल्लीतून काठगोदामला जाणाऱ्या ट्रेनला जोडण्यात आला होता, अशी माहितीही जवानांनी दिली. त्यामुळे, जवानांनी खाली उतरुन गोंधळ घातल्याने मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर ट्रेन अर्धा तास थांबली होती. जवानांचा डब्बा बाजुला करुन त्यातील एसी दुरूस्त करण्यात आला. त्यानंतर, कोलकाताला जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनशी जोडूनच जवानांना कोलकात्याला पाठवण्यात आले. 

दरम्यान, सुरुवातीला कोणीही आमच्या समस्येकडे लक्ष दिले नाही. मात्र, मुरादाबाद स्टेशनवर गोंधळ घातल्यानंतर ही समस्या प्राधान्याने सोडवण्यात आली, असेही जवानांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेSoldierसैनिकdelhiदिल्लीG20 Summitजी-२० शिखर परिषद