शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींवर टीका करणे भाजपा नेत्याला पडले भारी, नेटिझन्सनी केली धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:35 IST

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मात्र या टीकेनंतर नेटिझन्सनी हेगडे यांना ट्रोल केले आहे.  

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.टीकेनंतर नेटिझन्सनी हेगडे यांना ट्रोल केले आहे. अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेचे नागरिक असलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित विनायक बॅनर्जी, त्यांच्या फ्रेंच पत्नी एश्थर ड्युफ्लो आणि अमेरिकेचे प्रा. मायकेल क्रेमर या तिघांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. अर्थशास्त्रातील सैद्धांतिक संशोधनाबद्दल हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे प्रा. बॅनर्जी हे डॉ. अमर्त्य सेन यांच्यानंतरचे भारतीय वंशाचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत. बॅनर्जी यांचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मात्र या टीकेनंतर नेटिझन्सनी हेगडे यांना ट्रोल केले आहे. 

अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलं आहे. 'ज्या व्यक्तीने पप्पूच्या माध्यमातून महागाई आणि करप्रणाली वाढवण्याची शिफारस केली होती त्या व्यक्तीला 2019 चा नोबेल पुरस्कार मिळाला. न्याय योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला नोबेल मिळाल्याबाबत 'पप्पू' ला आनंद झाला असेल' असं ट्विट केलं आहे. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जींवर टीका करणे अनंतकुमार हेगडेंना भारी पडले आहे. नेटिझन्सनी हेगडेंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

नेटिझन्सनी अनंतकुमार हेगडे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या दोलायमान स्थितीत आहे व नजीकच्या भविष्यात ती सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले आहे. 

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला नोबेल मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रा. बॅनर्जी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान आहे. विकासदराची ताजी आकडेवारी पाहता, नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था सावरेल, याची खात्री देता येत नाही. गेली पाच-सहा वर्षे निदान काही विकास होताना तरी दिसत होता, पण ती आशाही आता मावळली आहे. पुरस्काराविषयी ते म्हणाले की, ज्यासाठी पुरस्कार दिला, त्या विषयावर मी गेली 20 वर्षे संशोधन करत आलो आहे. त्यातून आम्ही दारिद्र्य निर्मूलनाच्या समस्येवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण करिअरमध्ये एवढ्या लवकर हा पुरस्कार मिळेल, असे वाटले नव्हते.

 

टॅग्स :Anantkumar Hegdeअनंतकुमार हेगडेBJPभाजपाNobel Prizeनोबेल पुरस्कारTwitterट्विटर