शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 14:45 IST

तेलंगणाचा गड राखण्यात राव पिता-पुत्रांना यश आले आहे. त्यामुळे तेलंगणात 'अब की बार केसीआर' हा नारा खरा ठरला.

हैदराबाद - तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे गजवेल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. केसीआर यांनी 103916 मतं घेतली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार वंतेरु प्रताप रेड्डी यांना 55240 मतं मिळाली आहेत. त्यामुळे जवळपास 50 हजार मतांनी चंद्रशेखर राव यांनी गजवेल मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर राव यांचे पुत्र के.टी.रामारावे हेही सिरसिला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 

तेलंगणाचा गड राखण्यात राव पिता-पुत्रांना यश आले आहे. त्यामुळे तेलंगणात 'अब की बार केसीआर' हा नारा खरा ठरला. राव यांनी काँग्रेस उमेदवार वंतेरु प्रताप रेड्डी यांचा जवळपास 49 हजार मतांनी पराभव केला आहे. तर राव यांचे पुत्र केटी. रामाराव यांनी काँग्रेस उमेदवार करुणा महेंद्र रेड्डी यांचा जवळपास 85 हजार मतांनी पराभव केला आहे. रामाराम यांना 121758 मतं मिळाली असून काँग्रेसच्या रेड्डी यांना 34850 मतं मिळाली आहेत. 

देशातील सर्वात तरुण राज्य असलेल्या तेलंगणात दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक होत आहे. गतवर्षी राव यांच्या टीआरएस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर, यंदाही तेलंगणात टीआरएस यांच्याच पक्षाला लोकांनी संधी दिल्याचे दिसून येत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवाडीनुसार तेलंगणात टीआरएसने 40 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला 11 जागांवर यश मिळाले आहे. तर एमआयएमने तीन जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजपला अद्याप खातेही उघडता आले नाही. पण, भाजपा उमेदवार टी. राजासिंग हे विजयाच्या वाटेवर आहेत. तेलंगणातील एकंदरीत चित्र पाहता, तेलंगणात टीआरएसला 85 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला 22 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. मात्र, भाजपाल तेलंगणात चांगलाच मार खावा लागला आहे. भाजपला केवळ दोनच जागांवर आघाडी आहे.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा