शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 00:08 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुढील रणनीतीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए सातत्याने बैठका घेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली इंडिया आघाडीतून एका पक्षाने बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच दिल्लीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात आली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका आप स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत केवळ लोकसभेत आघाडी होती, विधानसभेला नको अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. आपच्या आमदारांची दिल्लीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

आमदारांच्या बैठकीनंतर आपचे संयोजक गोपाल राय यांनी म्हटलं की, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी नसेल. २०२५ च्या सुरुवातीला दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणारी विधानसभा निवडणूक यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी असा निर्णय पक्षाने घेतला असल्याचं गोपाल राय यांनी सांगितले.

तसेच लोकसभा निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे लढलो. मात्र विधानसभेला आम्हाला आघाडी नको. दिल्लीच्या जनतेला सोबत घेत आम्ही विधानसभेची लढाई लढू आणि जिंकू. आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने विधानसभेची निवडणूक लढेल असं गोपाल राय यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत ७ मतदारसंघात आप आणि काँग्रेस आघाडीने उतरली होती. त्यातील ४ जागांवर आप आणि ३ जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे केले. मात्र दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेस-आम आदमी पक्षाच्या आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे निकालाच्या तिसऱ्याच दिवशी आप पक्षाने एकला चलो रे नारा दिला आहे.

दरम्यान, निवडणुकीत दोन्ही पक्षांची मते एकमेकांना ट्रान्सफर करण्यात काँग्रेस-आपला अपयश आलं. त्याचसोबत पक्षाचे मोठे नेते जेलमध्ये राहिल्याने निवडणूक प्रचारात आप ताकदीने उतरू शकली नाही. त्यात स्वाती मालीवाल प्रकरणामुळे आम आदमी पक्षाचे नुकसान झालं. भाजपानं महिला सुरक्षेचा मुद्दा प्रचारात आणला. त्यात आम आदमी पक्ष बचावात्मक पवित्र्यात आला त्यामुळे दिल्लीत नुकसान झालं असं म्हटलं जातं. 

अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते?

एका मुलाखतीत अरविंद केजरीवालांनी काँग्रेससोबत आघाडीवर म्हटलं होतं की, आम्ही काँग्रेससोबत पर्मंनंट लग्न केले नाही. ना आमचं लव्ह मॅरेज झालंय, ना अरेंज मॅरेज..संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला आहे असं अरविंद केजरीवांनी विधान केले होते.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAAPआपcongressकाँग्रेसdelhiदिल्लीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल