शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वात नसलेले मंत्रालय चालवते होते आपचे मंत्री; पंजाब सरकारला २० महिन्यांनी आली जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:33 IST

पंजाबमध्ये आपचे एक मंत्री अस्तित्वात नसलेल्या खात्याचे काम पाहात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Punjab AAP Kuldeep Singh Dhaliwal: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारबाबत एक अजब प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार त्यांच्या एका मंत्र्‍यामुळे चांगलेच अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यशैलीवर टीका केली जात आहे. भगवंत मान यांच्या पंजाब सरकारला त्यांच्या एका मंत्र्यांकडे असं खातं होतं जे अस्तित्वात नाही हे समजायला २० महिने लागल्याचे समोर आलं आहे. पंजाब सरकारने आता या मंत्र्यांशी संबंधित अधिसूचना जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे.

पंजाब सरकारमधील राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल हे गेल्या २० महिन्यांपासून एक विभाग चालवत होते जे सरकारी कागदपत्रांमध्ये नव्हते. मंत्री कुलदीपसिंग धालीवाल यांना प्रशासकीय सुधारणा विभाग सोपवण्यात आला होता, पण आता सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे की असा कोणताही विभाग अस्तित्वात नव्हता. या सगळ्या प्रकारावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने या मुद्द्यावरून आप सरकारला धारेवर धरलं आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल आता फक्त अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. धालीवाल, अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री या नात्याने अमृतसरमध्ये अमेरिकेतून परत आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न हाताळताना दिसले तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. मात्र २० महिने मंत्री धारीवाल हे कोणत्या खात्याच्या नावावर निर्णय घेत राहिले, असा सवाल विरोधकांनी केलाय.

राज्यपालांनी जारी केलेल्या नवीन आदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शिफारशीनुसार धालीवाल यांचे मंत्रालय ७ फेब्रुवारी २०२५ पासून बदलण्यात आल्याचे म्हटलं आहे. यापूर्वी त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण खातेही होते. मे २०२३ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यानंतर त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना एनआरआय प्रकरणांसह प्रशासकीय सुधारणा खाते देण्यात आले, जे आता अस्तित्वातच नसल्याचे समोर आलं आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या विभागाच्या नावाने एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता तसेच त्याची कधी बैठकही झाली नाही. मुख्यमंत्री भगवंत मान, अर्थमंत्री हरपाल चीमा, अक्षय ऊर्जा मंत्री अमन अरोरा आणि सामाजिक न्याय मंत्री डॉ. बलजीत कौर यांच्यानंतर धालीवाल हे पंजाब सरकारचे पाचवे ज्येष्ठ मंत्री आहेत. २० महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांना माहितही नव्हते की, आपले मंत्री एक असा विभाग चालवत आहेत जो अस्तित्वात नाही. त्यामुळे पंजाब सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान