शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अस्तित्वात नसलेले मंत्रालय चालवते होते आपचे मंत्री; पंजाब सरकारला २० महिन्यांनी आली जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:33 IST

पंजाबमध्ये आपचे एक मंत्री अस्तित्वात नसलेल्या खात्याचे काम पाहात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Punjab AAP Kuldeep Singh Dhaliwal: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारबाबत एक अजब प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार त्यांच्या एका मंत्र्‍यामुळे चांगलेच अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यशैलीवर टीका केली जात आहे. भगवंत मान यांच्या पंजाब सरकारला त्यांच्या एका मंत्र्यांकडे असं खातं होतं जे अस्तित्वात नाही हे समजायला २० महिने लागल्याचे समोर आलं आहे. पंजाब सरकारने आता या मंत्र्यांशी संबंधित अधिसूचना जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे.

पंजाब सरकारमधील राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल हे गेल्या २० महिन्यांपासून एक विभाग चालवत होते जे सरकारी कागदपत्रांमध्ये नव्हते. मंत्री कुलदीपसिंग धालीवाल यांना प्रशासकीय सुधारणा विभाग सोपवण्यात आला होता, पण आता सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे की असा कोणताही विभाग अस्तित्वात नव्हता. या सगळ्या प्रकारावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने या मुद्द्यावरून आप सरकारला धारेवर धरलं आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल आता फक्त अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. धालीवाल, अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री या नात्याने अमृतसरमध्ये अमेरिकेतून परत आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न हाताळताना दिसले तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. मात्र २० महिने मंत्री धारीवाल हे कोणत्या खात्याच्या नावावर निर्णय घेत राहिले, असा सवाल विरोधकांनी केलाय.

राज्यपालांनी जारी केलेल्या नवीन आदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शिफारशीनुसार धालीवाल यांचे मंत्रालय ७ फेब्रुवारी २०२५ पासून बदलण्यात आल्याचे म्हटलं आहे. यापूर्वी त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण खातेही होते. मे २०२३ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यानंतर त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना एनआरआय प्रकरणांसह प्रशासकीय सुधारणा खाते देण्यात आले, जे आता अस्तित्वातच नसल्याचे समोर आलं आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या विभागाच्या नावाने एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता तसेच त्याची कधी बैठकही झाली नाही. मुख्यमंत्री भगवंत मान, अर्थमंत्री हरपाल चीमा, अक्षय ऊर्जा मंत्री अमन अरोरा आणि सामाजिक न्याय मंत्री डॉ. बलजीत कौर यांच्यानंतर धालीवाल हे पंजाब सरकारचे पाचवे ज्येष्ठ मंत्री आहेत. २० महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांना माहितही नव्हते की, आपले मंत्री एक असा विभाग चालवत आहेत जो अस्तित्वात नाही. त्यामुळे पंजाब सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान