शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अस्तित्वात नसलेले मंत्रालय चालवते होते आपचे मंत्री; पंजाब सरकारला २० महिन्यांनी आली जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:33 IST

पंजाबमध्ये आपचे एक मंत्री अस्तित्वात नसलेल्या खात्याचे काम पाहात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Punjab AAP Kuldeep Singh Dhaliwal: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारबाबत एक अजब प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार त्यांच्या एका मंत्र्‍यामुळे चांगलेच अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यशैलीवर टीका केली जात आहे. भगवंत मान यांच्या पंजाब सरकारला त्यांच्या एका मंत्र्यांकडे असं खातं होतं जे अस्तित्वात नाही हे समजायला २० महिने लागल्याचे समोर आलं आहे. पंजाब सरकारने आता या मंत्र्यांशी संबंधित अधिसूचना जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे.

पंजाब सरकारमधील राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल हे गेल्या २० महिन्यांपासून एक विभाग चालवत होते जे सरकारी कागदपत्रांमध्ये नव्हते. मंत्री कुलदीपसिंग धालीवाल यांना प्रशासकीय सुधारणा विभाग सोपवण्यात आला होता, पण आता सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे की असा कोणताही विभाग अस्तित्वात नव्हता. या सगळ्या प्रकारावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने या मुद्द्यावरून आप सरकारला धारेवर धरलं आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल आता फक्त अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. धालीवाल, अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री या नात्याने अमृतसरमध्ये अमेरिकेतून परत आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न हाताळताना दिसले तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. मात्र २० महिने मंत्री धारीवाल हे कोणत्या खात्याच्या नावावर निर्णय घेत राहिले, असा सवाल विरोधकांनी केलाय.

राज्यपालांनी जारी केलेल्या नवीन आदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शिफारशीनुसार धालीवाल यांचे मंत्रालय ७ फेब्रुवारी २०२५ पासून बदलण्यात आल्याचे म्हटलं आहे. यापूर्वी त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण खातेही होते. मे २०२३ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यानंतर त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना एनआरआय प्रकरणांसह प्रशासकीय सुधारणा खाते देण्यात आले, जे आता अस्तित्वातच नसल्याचे समोर आलं आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या विभागाच्या नावाने एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता तसेच त्याची कधी बैठकही झाली नाही. मुख्यमंत्री भगवंत मान, अर्थमंत्री हरपाल चीमा, अक्षय ऊर्जा मंत्री अमन अरोरा आणि सामाजिक न्याय मंत्री डॉ. बलजीत कौर यांच्यानंतर धालीवाल हे पंजाब सरकारचे पाचवे ज्येष्ठ मंत्री आहेत. २० महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांना माहितही नव्हते की, आपले मंत्री एक असा विभाग चालवत आहेत जो अस्तित्वात नाही. त्यामुळे पंजाब सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान