शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

तरुणाने विवाहितेला पळवलं, गावात परतल्यावर दोन कुटुंबात झाली हाणामारी, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:37 IST

Rajasthan Crime News: राएका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या करौली खालसा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्याशिवाय एक महिला आणि एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. आता या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.  

या वादावादीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी गावातील जसमाल नावाच्या तरुणाने आमच्या घरातील एका सुनेला फूस लावून फळवून नेले होते. त्याच्याविरोदात रामगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता एक दोन दिवसांपूर्वी जसमाल गावात आला तेव्हा कुटुंबीयांनी त्याच्याकडे सुनेूाबत विचारणा केली. त्यावरून जसमालचे कुटुंबीय संतप्त झाले. तसेच त्यांनी भांडण करण्यास सुरुवात केली. 

बघता बघता वादावादीचं पर्यावसान हाणामारीत झालं. जसमालच्या कुटुंबातील महिलांसह सर्व व्यक्तींनी लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. यादरम्यान, जसमाल, इन्नस आणि अरशद यांनी पाच वर्षांच्या एका मुलावर हल्ला केला. त्यात त्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिला आणि एक मुलगी जखमी झाली. 

या घटनेबाबत रामगडचे डीएसपी सुनील कुमार यांनी सांगितले की, करौली खालसा गावामध्ये दोन पक्षांमध्ये भांडण झालं होतं. त्यात पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मारहाण आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारRajasthanराजस्थान