शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तरुणाने विवाहितेला पळवलं, गावात परतल्यावर दोन कुटुंबात झाली हाणामारी, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:37 IST

Rajasthan Crime News: राएका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या करौली खालसा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्याशिवाय एक महिला आणि एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. आता या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.  

या वादावादीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी गावातील जसमाल नावाच्या तरुणाने आमच्या घरातील एका सुनेला फूस लावून फळवून नेले होते. त्याच्याविरोदात रामगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता एक दोन दिवसांपूर्वी जसमाल गावात आला तेव्हा कुटुंबीयांनी त्याच्याकडे सुनेूाबत विचारणा केली. त्यावरून जसमालचे कुटुंबीय संतप्त झाले. तसेच त्यांनी भांडण करण्यास सुरुवात केली. 

बघता बघता वादावादीचं पर्यावसान हाणामारीत झालं. जसमालच्या कुटुंबातील महिलांसह सर्व व्यक्तींनी लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. यादरम्यान, जसमाल, इन्नस आणि अरशद यांनी पाच वर्षांच्या एका मुलावर हल्ला केला. त्यात त्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिला आणि एक मुलगी जखमी झाली. 

या घटनेबाबत रामगडचे डीएसपी सुनील कुमार यांनी सांगितले की, करौली खालसा गावामध्ये दोन पक्षांमध्ये भांडण झालं होतं. त्यात पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मारहाण आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारRajasthanराजस्थान