शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ऐतिहासिक क्षणांची ठरली साक्षीदार; जुन्या संसदेतील ठळक आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 07:51 IST

भारताची राज्यघटना २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संसदेमध्ये स्वीकारण्यात आली.

नवी दिल्ली - संसदेचे कामकाज आता नव्या इमारतीतून हाेणार आहे. १९२७ मध्ये संसद भवनाचे उद्घाटन झाले हाेते. जुनी इमारत ९० वर्षांपेक्षा जास्त वयाची झाली असली तरी याच इमारतीने देशाच्या स्वातंत्र्याची ७६ वर्षे पाहिली आहेत. या कालावधीत अनेक ऐतिहासिक घटनांची ही इमारत साक्षीदार ठरली आहे. त्यापैकी काही माेजक्या घटना जाणून घेऊ या....

देश स्वतंत्र झाला त्यावेळी १५ ऑगस्ट १९४७ राेजी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पहिले ऐतिहासिक भाषण केले हाेते. विसाव्या शतकातील महान भाषणांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख हाेताे.

भारताची राज्यघटना २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संसदेमध्ये स्वीकारण्यात आली. त्यानंतर २६ जानेवारी १९५०पासून ती लागू झाली. हा महत्त्वाचा क्षण जुन्या भवनातील एक अजरामर क्षण आहे.

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ राेजी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी संसदेत १४ फेब्रुवारी १९६६ राेजी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पंतप्रधान म्हणून प्रथमच पाऊल ठेवले.

माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन अर्थमंत्री मनमाेहन सिंग यांनी २४ जुलै १९९१ राेजी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकरणारा अर्थसंकल्प सादर केला. जगासाठी भारताचे दरवाजे त्यामुळे खुले झाले. जागतिकीकरणात भारताचे ते पहिले पाऊल हाेते.भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची सर्वप्रथम १९९६मध्ये शपथ घेतली. हे सरकार केवळ १३ दिवस टिकले. बहुमत सिद्ध करताना त्यांनी केलेले भाषण संस्मरणीय ठरले.

माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांच्या सरकारविराेधात डाव्या पक्षांनी अमेरिकेसाेबतच्या ऐतिहासिक अणुकरारावरून अविश्वास प्रस्ताव आणला हाेता. २२ जुलै २००८ राेजी या प्रस्तावाला मनमाेहन सरकार सामाेरे गेले आणि जिंकले हाेते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदेत सर्वप्रथम प्रवेश करताना पायऱ्यांवर डाेके टेकवून लाेकशाहीच्या मंदिरासमाेर नमस्कार केला.ऑगस्ट २०१६मध्ये संसदेत महत्त्वपूर्ण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर झाले. देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल हाेते.

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यात आले. संसदेत ५ ऑगस्ट २०१९ राेजी हा ऐतिहासिक ठराव मंजूर झाला.

टॅग्स :Parliamentसंसद