शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

अनेक ऐतिहासिक क्षणांची ठरली साक्षीदार; जुन्या संसदेतील ठळक आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 07:51 IST

भारताची राज्यघटना २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संसदेमध्ये स्वीकारण्यात आली.

नवी दिल्ली - संसदेचे कामकाज आता नव्या इमारतीतून हाेणार आहे. १९२७ मध्ये संसद भवनाचे उद्घाटन झाले हाेते. जुनी इमारत ९० वर्षांपेक्षा जास्त वयाची झाली असली तरी याच इमारतीने देशाच्या स्वातंत्र्याची ७६ वर्षे पाहिली आहेत. या कालावधीत अनेक ऐतिहासिक घटनांची ही इमारत साक्षीदार ठरली आहे. त्यापैकी काही माेजक्या घटना जाणून घेऊ या....

देश स्वतंत्र झाला त्यावेळी १५ ऑगस्ट १९४७ राेजी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पहिले ऐतिहासिक भाषण केले हाेते. विसाव्या शतकातील महान भाषणांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख हाेताे.

भारताची राज्यघटना २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संसदेमध्ये स्वीकारण्यात आली. त्यानंतर २६ जानेवारी १९५०पासून ती लागू झाली. हा महत्त्वाचा क्षण जुन्या भवनातील एक अजरामर क्षण आहे.

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ राेजी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी संसदेत १४ फेब्रुवारी १९६६ राेजी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पंतप्रधान म्हणून प्रथमच पाऊल ठेवले.

माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन अर्थमंत्री मनमाेहन सिंग यांनी २४ जुलै १९९१ राेजी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकरणारा अर्थसंकल्प सादर केला. जगासाठी भारताचे दरवाजे त्यामुळे खुले झाले. जागतिकीकरणात भारताचे ते पहिले पाऊल हाेते.भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची सर्वप्रथम १९९६मध्ये शपथ घेतली. हे सरकार केवळ १३ दिवस टिकले. बहुमत सिद्ध करताना त्यांनी केलेले भाषण संस्मरणीय ठरले.

माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांच्या सरकारविराेधात डाव्या पक्षांनी अमेरिकेसाेबतच्या ऐतिहासिक अणुकरारावरून अविश्वास प्रस्ताव आणला हाेता. २२ जुलै २००८ राेजी या प्रस्तावाला मनमाेहन सरकार सामाेरे गेले आणि जिंकले हाेते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदेत सर्वप्रथम प्रवेश करताना पायऱ्यांवर डाेके टेकवून लाेकशाहीच्या मंदिरासमाेर नमस्कार केला.ऑगस्ट २०१६मध्ये संसदेत महत्त्वपूर्ण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर झाले. देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल हाेते.

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यात आले. संसदेत ५ ऑगस्ट २०१९ राेजी हा ऐतिहासिक ठराव मंजूर झाला.

टॅग्स :Parliamentसंसद