शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:21 IST

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात असं रेवंत रेड्डींनी सांगितले. 

हैदराबाद - जर तुम्ही कायम प्रादेशिक पक्षांना मतदान करत राहिला तर शेवटी ते भाजपा सरकारला पाठिंबा देतात. संविधान आणि आरक्षण वाचवायचं असेल काँग्रेसला मतदान करा असं आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. या देशात फक्त २ पक्ष आहेत. एक मोदी परिवार आणि दुसरा गांधी परिवार असंही रेड्डी यांनी म्हटलं. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्पसंख्याक जागृती दिन कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मोदी परिवार देशाचे धर्माच्या नावाने विभाजन करत आहे तर गांधी परिवार या देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. भाजपा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आणि आरक्षण काढून घेईल. त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या गोड बोलण्याला भुलून तुम्ही काँग्रेसपासून अंतर ठेवू नका. काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही दोन डोळ्यासारखे मानते पण काही वेळा अल्पसंख्याकांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुस्लीम भावनिक आहेत. रमजानमध्ये ते शेरवाणी घालतात, तुमच्यासोबत बिर्याणी खातात. या भावनेतून तुम्ही प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देता पण आता विचार करा. ते तुमची मते घेतात आणि दिल्लीत कोणाला पाठिंबा देतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच आगामी महाराष्ट्र, झारखंड निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या मजबूत झाल्यास ते संविधान बदलतील आणि मुस्लिम आरक्षण रद्द करतील. अल्पसंख्याकांनी त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगायला हवे जे महाराष्ट्रात राहतात. भाजपाला हरवा आणि काँग्रेसच्या विजयासाठी मतदान करा. काँग्रेसने अल्पसंख्याकांना कधीही व्होट बँक म्हणून वागवले नाही, तर कुटुंबातील सदस्य आणि भारताचे नागरिक म्हणून वागणूक दिली असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षात काँग्रेस निवडणुकांमध्ये जिंकली आणि हरली. परंतु यंदा विजय महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात. मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला तिथे मोदी भेटायलाही गेले नाहीत पण राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी देशाला एकत्र ठेवणारी भारत जोडो यात्रा काढली अशी आठवणही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMuslimमुस्लीमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा