शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:21 IST

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात असं रेवंत रेड्डींनी सांगितले. 

हैदराबाद - जर तुम्ही कायम प्रादेशिक पक्षांना मतदान करत राहिला तर शेवटी ते भाजपा सरकारला पाठिंबा देतात. संविधान आणि आरक्षण वाचवायचं असेल काँग्रेसला मतदान करा असं आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. या देशात फक्त २ पक्ष आहेत. एक मोदी परिवार आणि दुसरा गांधी परिवार असंही रेड्डी यांनी म्हटलं. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्पसंख्याक जागृती दिन कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मोदी परिवार देशाचे धर्माच्या नावाने विभाजन करत आहे तर गांधी परिवार या देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. भाजपा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आणि आरक्षण काढून घेईल. त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या गोड बोलण्याला भुलून तुम्ही काँग्रेसपासून अंतर ठेवू नका. काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही दोन डोळ्यासारखे मानते पण काही वेळा अल्पसंख्याकांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुस्लीम भावनिक आहेत. रमजानमध्ये ते शेरवाणी घालतात, तुमच्यासोबत बिर्याणी खातात. या भावनेतून तुम्ही प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देता पण आता विचार करा. ते तुमची मते घेतात आणि दिल्लीत कोणाला पाठिंबा देतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच आगामी महाराष्ट्र, झारखंड निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या मजबूत झाल्यास ते संविधान बदलतील आणि मुस्लिम आरक्षण रद्द करतील. अल्पसंख्याकांनी त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगायला हवे जे महाराष्ट्रात राहतात. भाजपाला हरवा आणि काँग्रेसच्या विजयासाठी मतदान करा. काँग्रेसने अल्पसंख्याकांना कधीही व्होट बँक म्हणून वागवले नाही, तर कुटुंबातील सदस्य आणि भारताचे नागरिक म्हणून वागणूक दिली असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षात काँग्रेस निवडणुकांमध्ये जिंकली आणि हरली. परंतु यंदा विजय महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात. मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला तिथे मोदी भेटायलाही गेले नाहीत पण राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी देशाला एकत्र ठेवणारी भारत जोडो यात्रा काढली अशी आठवणही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMuslimमुस्लीमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा