शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:21 IST

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात असं रेवंत रेड्डींनी सांगितले. 

हैदराबाद - जर तुम्ही कायम प्रादेशिक पक्षांना मतदान करत राहिला तर शेवटी ते भाजपा सरकारला पाठिंबा देतात. संविधान आणि आरक्षण वाचवायचं असेल काँग्रेसला मतदान करा असं आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. या देशात फक्त २ पक्ष आहेत. एक मोदी परिवार आणि दुसरा गांधी परिवार असंही रेड्डी यांनी म्हटलं. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्पसंख्याक जागृती दिन कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मोदी परिवार देशाचे धर्माच्या नावाने विभाजन करत आहे तर गांधी परिवार या देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. भाजपा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आणि आरक्षण काढून घेईल. त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या गोड बोलण्याला भुलून तुम्ही काँग्रेसपासून अंतर ठेवू नका. काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही दोन डोळ्यासारखे मानते पण काही वेळा अल्पसंख्याकांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुस्लीम भावनिक आहेत. रमजानमध्ये ते शेरवाणी घालतात, तुमच्यासोबत बिर्याणी खातात. या भावनेतून तुम्ही प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देता पण आता विचार करा. ते तुमची मते घेतात आणि दिल्लीत कोणाला पाठिंबा देतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच आगामी महाराष्ट्र, झारखंड निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या मजबूत झाल्यास ते संविधान बदलतील आणि मुस्लिम आरक्षण रद्द करतील. अल्पसंख्याकांनी त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगायला हवे जे महाराष्ट्रात राहतात. भाजपाला हरवा आणि काँग्रेसच्या विजयासाठी मतदान करा. काँग्रेसने अल्पसंख्याकांना कधीही व्होट बँक म्हणून वागवले नाही, तर कुटुंबातील सदस्य आणि भारताचे नागरिक म्हणून वागणूक दिली असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षात काँग्रेस निवडणुकांमध्ये जिंकली आणि हरली. परंतु यंदा विजय महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात. मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला तिथे मोदी भेटायलाही गेले नाहीत पण राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी देशाला एकत्र ठेवणारी भारत जोडो यात्रा काढली अशी आठवणही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMuslimमुस्लीमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा