शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:21 IST

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात असं रेवंत रेड्डींनी सांगितले. 

हैदराबाद - जर तुम्ही कायम प्रादेशिक पक्षांना मतदान करत राहिला तर शेवटी ते भाजपा सरकारला पाठिंबा देतात. संविधान आणि आरक्षण वाचवायचं असेल काँग्रेसला मतदान करा असं आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. या देशात फक्त २ पक्ष आहेत. एक मोदी परिवार आणि दुसरा गांधी परिवार असंही रेड्डी यांनी म्हटलं. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्पसंख्याक जागृती दिन कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मोदी परिवार देशाचे धर्माच्या नावाने विभाजन करत आहे तर गांधी परिवार या देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. भाजपा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आणि आरक्षण काढून घेईल. त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या गोड बोलण्याला भुलून तुम्ही काँग्रेसपासून अंतर ठेवू नका. काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही दोन डोळ्यासारखे मानते पण काही वेळा अल्पसंख्याकांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुस्लीम भावनिक आहेत. रमजानमध्ये ते शेरवाणी घालतात, तुमच्यासोबत बिर्याणी खातात. या भावनेतून तुम्ही प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देता पण आता विचार करा. ते तुमची मते घेतात आणि दिल्लीत कोणाला पाठिंबा देतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच आगामी महाराष्ट्र, झारखंड निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या मजबूत झाल्यास ते संविधान बदलतील आणि मुस्लिम आरक्षण रद्द करतील. अल्पसंख्याकांनी त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगायला हवे जे महाराष्ट्रात राहतात. भाजपाला हरवा आणि काँग्रेसच्या विजयासाठी मतदान करा. काँग्रेसने अल्पसंख्याकांना कधीही व्होट बँक म्हणून वागवले नाही, तर कुटुंबातील सदस्य आणि भारताचे नागरिक म्हणून वागणूक दिली असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षात काँग्रेस निवडणुकांमध्ये जिंकली आणि हरली. परंतु यंदा विजय महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात. मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला तिथे मोदी भेटायलाही गेले नाहीत पण राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी देशाला एकत्र ठेवणारी भारत जोडो यात्रा काढली अशी आठवणही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMuslimमुस्लीमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा