शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजस्थानमध्ये भीषण अपघात! बसमध्ये प्रवास करणाऱ्या ११ जणांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 08:35 IST

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस गुजरातहून मथुरेच्या दिशेने जात होती.

नवी दिल्ली: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळी एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे ट्रकच्या धडकेने बसमध्ये प्रवास करणाऱ्या ११ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस गुजरातहून मथुरेच्या दिशेने जात होती. जयपूर-आग्रा महामार्गावरील नादबाई पोलीस स्टेशन हद्दीतील जयपूर आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हंतारा पुलावर बसचा ब्रेक फेल झाला. ड्रायव्हरने बस उभी करून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सदर बस गुजरातमधील भावनगर येथून जयपूर आणि भरतपूरमार्गे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व प्रवाशांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ११ जणांना मृत घोषित केले. सुमारे २० गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू