शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अंगावर काटा आणणारं दृश्य! भरधाव कारची माय-लेकीसह महिलेला धडक; तिघींचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 15:56 IST

हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तिन्ही महिला दूरवर फेकल्या गेल्या.

तेलंगणातील रंगारेड्डी येथे एका भरधाव कारने रस्त्यावरून चालत असलेल्या तीन महिलांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तिन्ही महिला दूरवर फेकल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या या अपघातात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना हैदरशकोटच्या नरसानीगी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.  

माहितीनुसार, स्थानिक पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. कारचा वेग जास्त असल्याकारणाने चालकाचे नियंत्रण सुटले अन् हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये आई, मुलगी आणि त्यांच्या ओळखीच्या एका महिलेचा समावेश आहे. या तिघीही मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हा अपघात झाला. तिन्ही महिला रस्त्याने चालत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.  

अपघातांचे सत्र सुरूचमागील काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये भीषण अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलीकडेच महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर बस जळून झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनर हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन वाहनांना उडविल्यानंतर कंटेनर हॉटेल तोडून बाहेर पडला.  हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत कार्य सुरू झालेले आहे. दरम्यान, या आपघातातील मृतांचा आकडा वाढून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघातDeathमृत्यूcarकार