शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ धोकादायक; भारत-पाकिस्तानला अधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:00 IST

जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत.

नवी दिल्ली: जगाचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढल्यास करोडो लोकांसाठी जीवघेणे ठरू शकते. विशेषत: सिंधू नदी खोऱ्यात राहणारे भारत आणि पाकिस्तानमधील करोडो लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास उच्च आर्द्रतेसह उष्ण वारे वाहतील, जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असेल. वास्तविक, आर्द्रता जास्त असेल आणि उष्ण वारे किंवा उष्णतेच्या लाटा असतील तर घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे उष्माघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार, उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन आणि उप-सहारा आफ्रिकेत जास्त आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटा असतील.

भारत-पाकिस्तानमधील लोकांना अधिक फटका-

जगातील या प्रदेशात कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक बहुसंख्य राहतात, असेही संशोधनात म्हटले आहे. एअर कंडिशनरसारख्या सुविधांचा अभाव आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव यामुळे या लोकांना जीवघेण्या उष्णतेचा अधिक फटका बसणार आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील तापमान आधीच १.१५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान पाश्चात्य देशांनी उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे आहे. यामुळेच २०१५मध्ये पॅरिस करार झाला. तेव्हा औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्यापासून मर्यादित ठेवण्याचा करार करण्यात आला होता. या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची भीती आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने (IPCC) व्यक्त केली आहे. IPCC ने जागतिक उत्सर्जन कमी करण्याचे सुचवले आहे. जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत. तसेच, २०२३ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानIndiaभारतPakistanपाकिस्तान