शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ धोकादायक; भारत-पाकिस्तानला अधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:00 IST

जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत.

नवी दिल्ली: जगाचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढल्यास करोडो लोकांसाठी जीवघेणे ठरू शकते. विशेषत: सिंधू नदी खोऱ्यात राहणारे भारत आणि पाकिस्तानमधील करोडो लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास उच्च आर्द्रतेसह उष्ण वारे वाहतील, जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असेल. वास्तविक, आर्द्रता जास्त असेल आणि उष्ण वारे किंवा उष्णतेच्या लाटा असतील तर घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे उष्माघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार, उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन आणि उप-सहारा आफ्रिकेत जास्त आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटा असतील.

भारत-पाकिस्तानमधील लोकांना अधिक फटका-

जगातील या प्रदेशात कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक बहुसंख्य राहतात, असेही संशोधनात म्हटले आहे. एअर कंडिशनरसारख्या सुविधांचा अभाव आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव यामुळे या लोकांना जीवघेण्या उष्णतेचा अधिक फटका बसणार आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील तापमान आधीच १.१५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान पाश्चात्य देशांनी उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे आहे. यामुळेच २०१५मध्ये पॅरिस करार झाला. तेव्हा औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्यापासून मर्यादित ठेवण्याचा करार करण्यात आला होता. या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची भीती आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने (IPCC) व्यक्त केली आहे. IPCC ने जागतिक उत्सर्जन कमी करण्याचे सुचवले आहे. जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत. तसेच, २०२३ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानIndiaभारतPakistanपाकिस्तान