शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ धोकादायक; भारत-पाकिस्तानला अधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:00 IST

जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत.

नवी दिल्ली: जगाचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढल्यास करोडो लोकांसाठी जीवघेणे ठरू शकते. विशेषत: सिंधू नदी खोऱ्यात राहणारे भारत आणि पाकिस्तानमधील करोडो लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास उच्च आर्द्रतेसह उष्ण वारे वाहतील, जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असेल. वास्तविक, आर्द्रता जास्त असेल आणि उष्ण वारे किंवा उष्णतेच्या लाटा असतील तर घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे उष्माघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार, उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन आणि उप-सहारा आफ्रिकेत जास्त आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटा असतील.

भारत-पाकिस्तानमधील लोकांना अधिक फटका-

जगातील या प्रदेशात कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक बहुसंख्य राहतात, असेही संशोधनात म्हटले आहे. एअर कंडिशनरसारख्या सुविधांचा अभाव आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव यामुळे या लोकांना जीवघेण्या उष्णतेचा अधिक फटका बसणार आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील तापमान आधीच १.१५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान पाश्चात्य देशांनी उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे आहे. यामुळेच २०१५मध्ये पॅरिस करार झाला. तेव्हा औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्यापासून मर्यादित ठेवण्याचा करार करण्यात आला होता. या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची भीती आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने (IPCC) व्यक्त केली आहे. IPCC ने जागतिक उत्सर्जन कमी करण्याचे सुचवले आहे. जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत. तसेच, २०२३ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानIndiaभारतPakistanपाकिस्तान