शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ धोकादायक; भारत-पाकिस्तानला अधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:00 IST

जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत.

नवी दिल्ली: जगाचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढल्यास करोडो लोकांसाठी जीवघेणे ठरू शकते. विशेषत: सिंधू नदी खोऱ्यात राहणारे भारत आणि पाकिस्तानमधील करोडो लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास उच्च आर्द्रतेसह उष्ण वारे वाहतील, जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असेल. वास्तविक, आर्द्रता जास्त असेल आणि उष्ण वारे किंवा उष्णतेच्या लाटा असतील तर घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे उष्माघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार, उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन आणि उप-सहारा आफ्रिकेत जास्त आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटा असतील.

भारत-पाकिस्तानमधील लोकांना अधिक फटका-

जगातील या प्रदेशात कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक बहुसंख्य राहतात, असेही संशोधनात म्हटले आहे. एअर कंडिशनरसारख्या सुविधांचा अभाव आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव यामुळे या लोकांना जीवघेण्या उष्णतेचा अधिक फटका बसणार आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील तापमान आधीच १.१५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान पाश्चात्य देशांनी उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे आहे. यामुळेच २०१५मध्ये पॅरिस करार झाला. तेव्हा औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्यापासून मर्यादित ठेवण्याचा करार करण्यात आला होता. या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची भीती आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने (IPCC) व्यक्त केली आहे. IPCC ने जागतिक उत्सर्जन कमी करण्याचे सुचवले आहे. जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत. तसेच, २०२३ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानIndiaभारतPakistanपाकिस्तान