शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये  नवा ट्विस्ट, JDU च्या लंचला ५ आमदारांची दांडी, RJDकडून मोर्चेबांधणी, १२ तारखेला काय होणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 10:30 IST

Bihar Poloitical Update: एनडीएकडे असलेलं काठावरचं संख्याबळ, आमदारांची नाराजी आणि लालू प्रसाद यादव यांच्याकडून होत असलेली मोर्चेबांधणी यामुळे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये काय होणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पारडे बदलून एनडीएमध्ये प्रवेश केल्याने बिहारच्या राजकारणातील समिकरणं पुन्हा बदलली आहेत. मात्र एनडीएकडे असलेलं काठावरचं संख्याबळ, आमदारांची नाराजी आणि लालू प्रसाद यादव यांच्याकडून होत असलेली मोर्चेबांधणी यामुळे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये काय होणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. बहुमत चाचणी पूर्वी संभाव्य फूट टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या सर्ल आमदारांची निवास्थानी बैठक बोलावली. तसेच त्यांना तिथेच थांबण्याचे आदेश दिले. तर जेडीयूने बोलावलेल्या मेजवानीला त्यांच्याच पक्षातील पाच आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभेत काय होणार याबाबतचा संभ्रम वाढला आहे. 

राष्ट्रीय जनता दलाचे जे आमदार तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांना तिथेच थांबावे लागले होते. त्यानंतर काही वेळातच आमदारांचं आवश्यक सामान तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. तसेच बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याबाबतही पेच निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे २१ फेब्रुवारीपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. एकीकडे तेजस्वी यांनी बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिलेले असल्याने नेमकं काय होणार याबाबत तर्क लढवले जात आहेत.  

दुसरीकडे नितीश कुमार आणि भाजपाकडूनही पुढील रणनीतीबाबत विचारमंथन सुरू आहे. आधी सर्व आमदारांना बिहारमध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर मंत्री श्रवण कुमार यांच्या निवास्थानी आमदारांना भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले. तसेच भाजपाने आपल्या सर्व आमदारांना दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बोधगया येथे बोलावले आहे. तसेच ११ फेब्रुवारीपर्यंत तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. 

मात्र श्रवण कुमार यांच्याकडून आयोजित भोजनाच्या मेजवानीला जेडीयूच्या पाच आमदारांनी दांडी मारली. आमदार बीमा भारती आणि सुदर्शन यांच्य अनुपस्थितीमागची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. या दोघांशिवाय शालिनी मिश्रा, दिलीप राय आणि संजीव सिंह हे पाटणा येथे उपस्थित नसल्याने मेजवानीला अनुपस्थित होते. दरम्यान, अनुपस्थित राहिलेल्या आमदारांशी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आहे. तर काँग्रेसचे १६ आमदार अद्यापही हैदराबादगमध्ये आहेत. हे आमदार आज बिहारमध्ये परतण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा