शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बिहारमध्ये  नवा ट्विस्ट, JDU च्या लंचला ५ आमदारांची दांडी, RJDकडून मोर्चेबांधणी, १२ तारखेला काय होणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 10:30 IST

Bihar Poloitical Update: एनडीएकडे असलेलं काठावरचं संख्याबळ, आमदारांची नाराजी आणि लालू प्रसाद यादव यांच्याकडून होत असलेली मोर्चेबांधणी यामुळे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये काय होणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पारडे बदलून एनडीएमध्ये प्रवेश केल्याने बिहारच्या राजकारणातील समिकरणं पुन्हा बदलली आहेत. मात्र एनडीएकडे असलेलं काठावरचं संख्याबळ, आमदारांची नाराजी आणि लालू प्रसाद यादव यांच्याकडून होत असलेली मोर्चेबांधणी यामुळे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये काय होणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. बहुमत चाचणी पूर्वी संभाव्य फूट टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या सर्ल आमदारांची निवास्थानी बैठक बोलावली. तसेच त्यांना तिथेच थांबण्याचे आदेश दिले. तर जेडीयूने बोलावलेल्या मेजवानीला त्यांच्याच पक्षातील पाच आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभेत काय होणार याबाबतचा संभ्रम वाढला आहे. 

राष्ट्रीय जनता दलाचे जे आमदार तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांना तिथेच थांबावे लागले होते. त्यानंतर काही वेळातच आमदारांचं आवश्यक सामान तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. तसेच बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याबाबतही पेच निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे २१ फेब्रुवारीपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. एकीकडे तेजस्वी यांनी बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिलेले असल्याने नेमकं काय होणार याबाबत तर्क लढवले जात आहेत.  

दुसरीकडे नितीश कुमार आणि भाजपाकडूनही पुढील रणनीतीबाबत विचारमंथन सुरू आहे. आधी सर्व आमदारांना बिहारमध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर मंत्री श्रवण कुमार यांच्या निवास्थानी आमदारांना भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले. तसेच भाजपाने आपल्या सर्व आमदारांना दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बोधगया येथे बोलावले आहे. तसेच ११ फेब्रुवारीपर्यंत तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. 

मात्र श्रवण कुमार यांच्याकडून आयोजित भोजनाच्या मेजवानीला जेडीयूच्या पाच आमदारांनी दांडी मारली. आमदार बीमा भारती आणि सुदर्शन यांच्य अनुपस्थितीमागची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. या दोघांशिवाय शालिनी मिश्रा, दिलीप राय आणि संजीव सिंह हे पाटणा येथे उपस्थित नसल्याने मेजवानीला अनुपस्थित होते. दरम्यान, अनुपस्थित राहिलेल्या आमदारांशी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आहे. तर काँग्रेसचे १६ आमदार अद्यापही हैदराबादगमध्ये आहेत. हे आमदार आज बिहारमध्ये परतण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा