शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

डोक्याला ताप देऊ नका, मी सुटीवर आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 09:30 IST

सुटीच्या दिवशीही बॉस काम सांगत असेल, ‘त्रास’ देत असेल तर? भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीने अशा बॉसला एक लाख रुपयांचा दंड करण्याचा इशारा दिला आहे!

- पवन देशपांडे

आपली सुटी आहे आणि त्या दिवशीही जर आपल्या कोणत्या सहकाऱ्याने किंवा बॉसने फोन करून, मेसेज करून किंवा मेल करून काम सांगितले तर?.. वैताग वैताग आणि वैताग... याशिवाय काहीच नाही.

कोरोनामुळे जगात कामांच्या तासांचे आणि स्वरूपाचे सर्व ठोकताळेच बदलले आहेत. कोरोना काळाच्या आधी सारेच कसे कार्यालयीन वेळेत जेवढे काम शक्य आहे तेवढे पूर्ण करायचे. उर्वरित काम सुटीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये जाऊनच व्हायचे. पण गेल्या दोन वर्षांत वर्क फ्रॉम होमचा जो ट्रेंड आलाय त्याने २४ बाय ७ अशी कामाची व्याख्या झाली आहे. म्हणजे तुम्ही घरून काम करत असाल तर केव्हाही तुम्ही कामासाठी उपलब्ध असायला हवे, असा ट्रेंड रुजायला सुरुवात झाली.

कंपन्यांनाही हे फावले. कारण कर्मचारी घरून काम करणार म्हणजे ऑफिसचा इतर खर्च आपोआपच कमी झाला. त्यातून मग कोरोना गेला तरी आणि लॉकडाउन संपले तरी वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड कायम आहे. ३० ते ४० टक्के कर्मचारी हल्ली घरूनच काम करत आहेत. त्यामुळे ते कधीही केव्हाही उपलब्ध असतील असा एक समज निर्माण झाला आहे. बरं घरून आणि हवे त्या ठिकाणाहून काम करता येत असल्याने कर्मचारीही फारसे त्याविरोधात आवाज उठवायच्या भानगडीत पडत नाहीत. पडल्याचे दिसलेही नाही. न्यू नॉर्मलने दिलेल्या या देणगीत आणखी एका नव्या नियमाची भर पडू पाहात आहे. ती म्हणजे सुटीच्या दिवशी त्रास द्यायचा नाही.

भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ या कंपनीने नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यास कामावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीने संपर्क करायचा नाही. केल्यास १ लाख रुपयांचा दंड केला जाईल, असा इशाराही कंपनीने दिला आहे. ‘ड्रीम इलेव्हन अनप्लग’ असे या योजनेचे नाव आहे. कंपनीचे सीईओ हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी याविषयी लिंक्ड इन या सोशल मीडिया साइटवर सविस्तर पोस्टही केली आहे. त्यात ते म्हणतात, सुटीच्या दिवशी आपल्या कुटुंबाला वेळ देणे किंवा आराम करणे यामुळे एकूणच कामावर सकारात्मक परिणाम होत असतो. सुटी संपल्यानंतर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मूड चांगला राहतो, परिणामी अशा कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढते आणि अप्रत्यक्षपणे त्याचा कंपनीला फायदा होतो.

या निर्णयामागे आणखीही एक मोठा विचार आहे. एखादा कर्मचारी सुटीच्या दिवशीही नेहमी काम करत असेल तर काही काळानंतर त्याच्या मनात कंपनीबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. सुटीच्या दिवशीही काम करायचे तर मग सुटी देता तरी कशाला, असा विचारही सुरू होतो. त्यातून मग नव्या जॉबचा शोध सुरू होतो. चांगले टॅलेंट बाहेर पडायला सुरुवात होते. हे जर होऊ द्यायचे नसेल तर कंपन्यांना काही धोरण आखणं गरजेचं आहे. २०२३ हे वर्ष असेच नवनवे धोरण घेऊन येणारे ठरणार आहे. त्यातला हा पहिला ट्रेंड असू शकतो की, टॅलेंट टिकवून ठेवायचे असेल तर त्यांच्या हक्काच्या सुटीच्या काळात त्यांना डिस्टर्ब करू नये.

गेल्या वर्षी एका सोशल मीडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५४ टक्के लोक सुटीच्या दिवशीही कामापासून दूर राहू शकत नव्हते. पण यामुळे काही कर्मचारी नाराजही होत असल्याचे आढळले होते. अशा लोकांचा कंपनी बदलण्याचा कलही वाढू लागला होता. म्हणूनच आयटी सेक्टरमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात कंपन्या बदलत होते. हायब्रिड वर्क कल्चर हाही अशाच एका धोरणाचा भाग आहे. चांगले कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या आता आठवड्यातील एखादा दिवस वर्क फ्रॉम होमचीही परवानगी देत आहेत. २०२३ हे वर्ष अशा नवनव्या वर्क कल्चरच्या ट्रेंडने भरलेले असणार आहे. ‘अनप्लगिंग’ हा त्याचा पहिला भाग आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी