शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

डोक्याला ताप देऊ नका, मी सुटीवर आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 09:30 IST

सुटीच्या दिवशीही बॉस काम सांगत असेल, ‘त्रास’ देत असेल तर? भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीने अशा बॉसला एक लाख रुपयांचा दंड करण्याचा इशारा दिला आहे!

- पवन देशपांडे

आपली सुटी आहे आणि त्या दिवशीही जर आपल्या कोणत्या सहकाऱ्याने किंवा बॉसने फोन करून, मेसेज करून किंवा मेल करून काम सांगितले तर?.. वैताग वैताग आणि वैताग... याशिवाय काहीच नाही.

कोरोनामुळे जगात कामांच्या तासांचे आणि स्वरूपाचे सर्व ठोकताळेच बदलले आहेत. कोरोना काळाच्या आधी सारेच कसे कार्यालयीन वेळेत जेवढे काम शक्य आहे तेवढे पूर्ण करायचे. उर्वरित काम सुटीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये जाऊनच व्हायचे. पण गेल्या दोन वर्षांत वर्क फ्रॉम होमचा जो ट्रेंड आलाय त्याने २४ बाय ७ अशी कामाची व्याख्या झाली आहे. म्हणजे तुम्ही घरून काम करत असाल तर केव्हाही तुम्ही कामासाठी उपलब्ध असायला हवे, असा ट्रेंड रुजायला सुरुवात झाली.

कंपन्यांनाही हे फावले. कारण कर्मचारी घरून काम करणार म्हणजे ऑफिसचा इतर खर्च आपोआपच कमी झाला. त्यातून मग कोरोना गेला तरी आणि लॉकडाउन संपले तरी वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड कायम आहे. ३० ते ४० टक्के कर्मचारी हल्ली घरूनच काम करत आहेत. त्यामुळे ते कधीही केव्हाही उपलब्ध असतील असा एक समज निर्माण झाला आहे. बरं घरून आणि हवे त्या ठिकाणाहून काम करता येत असल्याने कर्मचारीही फारसे त्याविरोधात आवाज उठवायच्या भानगडीत पडत नाहीत. पडल्याचे दिसलेही नाही. न्यू नॉर्मलने दिलेल्या या देणगीत आणखी एका नव्या नियमाची भर पडू पाहात आहे. ती म्हणजे सुटीच्या दिवशी त्रास द्यायचा नाही.

भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ या कंपनीने नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यास कामावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीने संपर्क करायचा नाही. केल्यास १ लाख रुपयांचा दंड केला जाईल, असा इशाराही कंपनीने दिला आहे. ‘ड्रीम इलेव्हन अनप्लग’ असे या योजनेचे नाव आहे. कंपनीचे सीईओ हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी याविषयी लिंक्ड इन या सोशल मीडिया साइटवर सविस्तर पोस्टही केली आहे. त्यात ते म्हणतात, सुटीच्या दिवशी आपल्या कुटुंबाला वेळ देणे किंवा आराम करणे यामुळे एकूणच कामावर सकारात्मक परिणाम होत असतो. सुटी संपल्यानंतर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मूड चांगला राहतो, परिणामी अशा कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढते आणि अप्रत्यक्षपणे त्याचा कंपनीला फायदा होतो.

या निर्णयामागे आणखीही एक मोठा विचार आहे. एखादा कर्मचारी सुटीच्या दिवशीही नेहमी काम करत असेल तर काही काळानंतर त्याच्या मनात कंपनीबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. सुटीच्या दिवशीही काम करायचे तर मग सुटी देता तरी कशाला, असा विचारही सुरू होतो. त्यातून मग नव्या जॉबचा शोध सुरू होतो. चांगले टॅलेंट बाहेर पडायला सुरुवात होते. हे जर होऊ द्यायचे नसेल तर कंपन्यांना काही धोरण आखणं गरजेचं आहे. २०२३ हे वर्ष असेच नवनवे धोरण घेऊन येणारे ठरणार आहे. त्यातला हा पहिला ट्रेंड असू शकतो की, टॅलेंट टिकवून ठेवायचे असेल तर त्यांच्या हक्काच्या सुटीच्या काळात त्यांना डिस्टर्ब करू नये.

गेल्या वर्षी एका सोशल मीडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५४ टक्के लोक सुटीच्या दिवशीही कामापासून दूर राहू शकत नव्हते. पण यामुळे काही कर्मचारी नाराजही होत असल्याचे आढळले होते. अशा लोकांचा कंपनी बदलण्याचा कलही वाढू लागला होता. म्हणूनच आयटी सेक्टरमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात कंपन्या बदलत होते. हायब्रिड वर्क कल्चर हाही अशाच एका धोरणाचा भाग आहे. चांगले कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या आता आठवड्यातील एखादा दिवस वर्क फ्रॉम होमचीही परवानगी देत आहेत. २०२३ हे वर्ष अशा नवनव्या वर्क कल्चरच्या ट्रेंडने भरलेले असणार आहे. ‘अनप्लगिंग’ हा त्याचा पहिला भाग आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी